Skip to main content

पालकत्वाच्या वाटा

👶🏻👴🏻👨🏻‍💻🤷🏻‍♀🙋🏼‍♀👨‍👨‍👧

*पालकत्वाच्या वाटा*

- *ज्ञानदेव नवसरे, नाशिक*
आपण अापल्या मुलांना अधिक आनंदी ,संस्कारित,सदृढ व जीवनात यश मिळवण्यासाठी काय काय करु शकतो?याचा विचार प्रत्येक पालक करत असेलच असे नाही. बहुतेक पालकांना स्वतः च्या व लेकरांच्या पोटाची खळगी भरण्याचीच चिंता असते तिथे पाल्याचा मानसिक, भावनिक ,सामाजिक विकासाच्यादृष्टीने प्रयत्न दूरच असतो.
माझा मुलगा चांगला व्हावा, हुशार व्हावा, समाजाभिमुख व्हावा यासाठी अगोदर पालकाने तसे घ्यावे लागते.पालकत्व हा महत्त्वाचा विषय पण पुरेशा वेळेअभावी अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात.

निसर्गतःच बालकाची वाढ होत असते. बालकांच्या स्वभावात वयानुसार काय बदल होतात?त्याच्या गरजा, अपेक्षा कोणत्या समजल्यानंतर बाल्याशी कशी वागावे यासाठी दिशा मिळते मग बालकाच्या गरजा ,अपेक्षा, समस्या कळायला नकोत का?  मुले कोणत्या वयात लाजतात?  कोणत्या वयाने 'नन्ना' चा पाढा गातात? हे अगोदरच पालकाला समजले तर मुलांशी जसे वागावे याबद्दल पालकांच्या मनात शंका उरत नाही.

आपण लहान असताना आई- वडील, आजी -आजोबा ,इतर घरातील माणसांनी आपल्याला कसं वाढवलं हे आपल्याला माहिती असतं?  आणि आठवलं तरी आता जुने दिवस कुठं उरलेत ? आता कुटुंब विभक्त झालीत. कुटुंबापासून  एकटी पडलीत .काहींना एकटे राहण्यात आनंद मिळतोय. एकदंरीत कुटुंबाचे स्वरूप आता बदललेले आहे.
 पूर्वी घरातील आजी -आजोबा ,आई -वडील मुलांसाठी जितका वेळ द्यायची तितका आज मुलांसाठी वेळ दिला जात नाही त्यामुळे पाळणाघरे, बालसंस्कार अशा संकल्पना उदयास आल्या.
लहानपणी मुलांसाठी वेळ दिलाच पाहिजे पाहिजे कारण लहानपणी मुलांसाठी दिलेला वेळ हा बाल्याच्या विकासाची पायाभरणी आहे ,हे प्रत्यक्ष समजून घ्यायला हवे.
पूर्वी अंगाईगीते, बडबडगीते ही आईच्या आवाजातील असायची त्याची जागा आज मोबाईलातील बाईने घेतलीय. आईच्या आवाजातील संगीतविरहित अंगाईगीते ही मोबाईलमधील बाईच्या संगातासह गायलेल्या अंगाईपेक्षा शंभर पटीने भारीय. आईच्या अंगाईत आपुलकी,प्रेम,जिव्हाळा आहे ततसा मोबाईलच्या अंगाई गीतात कुठंय?बालकांच्या आई वडील किंवा घरातील इतरांचा होणारा स्पर्श आणि अावाज यातून सुरक्षिततेची भावना येत असते .त्यामुळे साधे गायनही   बाळांना झोपी लावते. मोबाईलमध्ये अंगाईत लावून तासन् तास झोका द्यायची गरज उरत नाही. म्हणून पालकांनी किमान दोन -तीन अंगाईगीते पाठ करुन ठेवायला काय हरकत आहे ?
आत्ताच्या पालकांना प्रत्येक गोष्टी घाई झालीय.माझे बाळाचा विकास झपाट्याने व्हावा, माझे मूल इतरांपेक्षा हुशार व्हावे यासाठी रस्सीखेच सुरु असल्यासारखे वागतात. त्यासाठी बाजारातून कोणकोणत्या प्रकारचे साहित्य खरेदी करतात हे त्यांनाच माहिती. खरंतर बालकांची वाढ हा पूर्णतः निसर्गिक बाब आहे .बालकांच्या मानसिक, भावनिक विकासाच्यादृष्टीने मात्र आपल्याला प्रयत्न करतात येतात. बालकांच्या विकासाला पोषक वातावरण तयार करणे ,प्रसंग तयार करणे हे मात्र पालकाच्या हाती असते .
मुलांचा आहार,झोप,विश्रांती याकडे पालक कटाक्षाने लक्ष देत असतात तसेच लक्ष वयानुसार त्यांच्या गरजा, अपेक्षा, हालचाली, स्वभाव बदल, अडचणी याकडे पण लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे.
मूल लहान असो वा मोठे त्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे .मुलांच्या गरजा आणि  भावना यांचा अत्यंत जवळचा संबंध असतो.मुलांच्या गरजा लक्षात आल्या की त्यांच्या वागण्यातील बदल लक्षात येतो त्यातूनच मुलांच्या भावना समजतात. मुलांच्या भावना,अपेक्षा, गरजा समजल्या की त्याच्या विकासासाठी काय करता येईल हे लक्षात येते तेव्हा बाल्याच्या विकासाचा निम्मा टप्पा आपण ओलांडलेला असतो. यातून मुलांसोबत कसे बोलावे, काय बोलावे, कोणते प्रसंग तयार करावेत, कोणत्या अडचणी आहेत,कोणते खेळ खेळावेत ,कोणते अनुभव सांगावेत अशा अनेक गोष्टीबाबत समजल्याने पालकांनाही दिशा मिळून जाते.
धन्यवाद 🙏🏻

Comments

Popular posts from this blog

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

मुलांना दिशा देऊयात

* मुलांना दिशा देऊयात *   अाज नेहमीप्रमाणे शंभू खिदळून आला होता पण त्याच्या चेह-यावरील तेज कमालीचे होते. "आप्पा चला ना खेळायला जावू" शंभू लाडात येऊन बोलला. मी शाळेतून दमून आलो होतो.  "नको रे शंभू ,मी खुप दमलोय. " आई सांग ना आप्पाला ." खरतर आमचं दोघांचं खेळणं म्हणजे भारीच असतयं.  शंभूच्या खेळण्यांसोबत रमताना मलाही लहानपणाचा अनुभव घेता येत असतो.कधीकधी माझी बायको मला खुप हसते माझे बाळासोबत असतानाचे संवाद, चेह-यावरील हावभाव पाहून.😁 माझं लहान झालेलं पाहून शंंभू मात्र बिनधास्तपणे माझ्यासोबत खेळतो. ब्लाॅक्स ची भरणी आम्ही खाली घेतली .दोघंही वेगवेगळे आकार बनवायला लागलो. मी गाडीचा आकार बनविला अन शंभूचे काम सुरूच होते. "काय बनवितोय शंभू?" मी म्हणालो.  "मला घर बनवायचेय."  मी घराच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले अन त्यानेही सगळी उत्तरे दिली. "मला लय काही बी बनविता येते." शंभू बोलत होता.  काय काय बनविता येते? बंदूक, गाडी,घर,शाळा ,पाटी ,माणूस.  मी त्याचे कौतुक केले अन त्याला कवेत घेतले .यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांकडे गु...

जबाबदारी विकासाची

#जबाबदारी_विकासाची व्यक्तीच्या वर्तनात अपेक्षित वर्तनबदल घडवून आणणारी ,सर्वांगीण विकास साधणारी स्वयंस्फूर्त, अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया म्हणजे शिक्षण ...शिक्षण प्रक्रिया कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू असते.  मुलांच्या अध्ययनास मदत करणाऱ्या या संस्थांवर असणारी जबाबदारी सर्वांनी समजून घेणे गरजेचे असते. विद्यार्थी विकासाची संपूर्ण जबाबदारी शाळाचीच आहे असे म्हणणे म्हणजे स्वतः च्या जबाबदारीतून काढता पाय घेणे . कुटुंबाने काढता पाय घेतला तर मुलांच्या अध्ययनाच्या आणि विकासाच्या गतीवर परिणाम घडून येतो. मूल हे समाजाचा एक अविभाज्य घटक आहे .समाजातील सकारात्मक व नकारात्मक वातावरणात वाढत असते. शाळा ,कुटुंब यांनी निरीक्षणातून मुलांच्या विकासाच्यादृष्टीने प्रयत्नास मदत भेटत असते. शाळेतील अनेक गोष्टी मुलं कुटुंब आणि समाजाकडून शिकत असते याउलट समाजातील अनेक गोष्टी शाळा अन कुटुंबासोबत शिकत असते. कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या पातळीवर विद्यार्थी विकासाचा राजमार्ग पालक व शिक्षकांनी लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास मुलांचा सर्वांगीण विकास करणे सोपे जाते असे मला...