👶🏻👴🏻👨🏻💻🤷🏻♀🙋🏼♀👨👨👧
*पालकत्वाच्या वाटा*
- *ज्ञानदेव नवसरे, नाशिक*
आपण अापल्या मुलांना अधिक आनंदी ,संस्कारित,सदृढ व जीवनात यश मिळवण्यासाठी काय काय करु शकतो?याचा विचार प्रत्येक पालक करत असेलच असे नाही. बहुतेक पालकांना स्वतः च्या व लेकरांच्या पोटाची खळगी भरण्याचीच चिंता असते तिथे पाल्याचा मानसिक, भावनिक ,सामाजिक विकासाच्यादृष्टीने प्रयत्न दूरच असतो.
माझा मुलगा चांगला व्हावा, हुशार व्हावा, समाजाभिमुख व्हावा यासाठी अगोदर पालकाने तसे घ्यावे लागते.पालकत्व हा महत्त्वाचा विषय पण पुरेशा वेळेअभावी अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात.
निसर्गतःच बालकाची वाढ होत असते. बालकांच्या स्वभावात वयानुसार काय बदल होतात?त्याच्या गरजा, अपेक्षा कोणत्या समजल्यानंतर बाल्याशी कशी वागावे यासाठी दिशा मिळते मग बालकाच्या गरजा ,अपेक्षा, समस्या कळायला नकोत का? मुले कोणत्या वयात लाजतात? कोणत्या वयाने 'नन्ना' चा पाढा गातात? हे अगोदरच पालकाला समजले तर मुलांशी जसे वागावे याबद्दल पालकांच्या मनात शंका उरत नाही.
आपण लहान असताना आई- वडील, आजी -आजोबा ,इतर घरातील माणसांनी आपल्याला कसं वाढवलं हे आपल्याला माहिती असतं? आणि आठवलं तरी आता जुने दिवस कुठं उरलेत ? आता कुटुंब विभक्त झालीत. कुटुंबापासून एकटी पडलीत .काहींना एकटे राहण्यात आनंद मिळतोय. एकदंरीत कुटुंबाचे स्वरूप आता बदललेले आहे.
पूर्वी घरातील आजी -आजोबा ,आई -वडील मुलांसाठी जितका वेळ द्यायची तितका आज मुलांसाठी वेळ दिला जात नाही त्यामुळे पाळणाघरे, बालसंस्कार अशा संकल्पना उदयास आल्या.
लहानपणी मुलांसाठी वेळ दिलाच पाहिजे पाहिजे कारण लहानपणी मुलांसाठी दिलेला वेळ हा बाल्याच्या विकासाची पायाभरणी आहे ,हे प्रत्यक्ष समजून घ्यायला हवे.
पूर्वी अंगाईगीते, बडबडगीते ही आईच्या आवाजातील असायची त्याची जागा आज मोबाईलातील बाईने घेतलीय. आईच्या आवाजातील संगीतविरहित अंगाईगीते ही मोबाईलमधील बाईच्या संगातासह गायलेल्या अंगाईपेक्षा शंभर पटीने भारीय. आईच्या अंगाईत आपुलकी,प्रेम,जिव्हाळा आहे ततसा मोबाईलच्या अंगाई गीतात कुठंय?बालकांच्या आई वडील किंवा घरातील इतरांचा होणारा स्पर्श आणि अावाज यातून सुरक्षिततेची भावना येत असते .त्यामुळे साधे गायनही बाळांना झोपी लावते. मोबाईलमध्ये अंगाईत लावून तासन् तास झोका द्यायची गरज उरत नाही. म्हणून पालकांनी किमान दोन -तीन अंगाईगीते पाठ करुन ठेवायला काय हरकत आहे ?
आत्ताच्या पालकांना प्रत्येक गोष्टी घाई झालीय.माझे बाळाचा विकास झपाट्याने व्हावा, माझे मूल इतरांपेक्षा हुशार व्हावे यासाठी रस्सीखेच सुरु असल्यासारखे वागतात. त्यासाठी बाजारातून कोणकोणत्या प्रकारचे साहित्य खरेदी करतात हे त्यांनाच माहिती. खरंतर बालकांची वाढ हा पूर्णतः निसर्गिक बाब आहे .बालकांच्या मानसिक, भावनिक विकासाच्यादृष्टीने मात्र आपल्याला प्रयत्न करतात येतात. बालकांच्या विकासाला पोषक वातावरण तयार करणे ,प्रसंग तयार करणे हे मात्र पालकाच्या हाती असते .
मुलांचा आहार,झोप,विश्रांती याकडे पालक कटाक्षाने लक्ष देत असतात तसेच लक्ष वयानुसार त्यांच्या गरजा, अपेक्षा, हालचाली, स्वभाव बदल, अडचणी याकडे पण लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे.
मूल लहान असो वा मोठे त्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे .मुलांच्या गरजा आणि भावना यांचा अत्यंत जवळचा संबंध असतो.मुलांच्या गरजा लक्षात आल्या की त्यांच्या वागण्यातील बदल लक्षात येतो त्यातूनच मुलांच्या भावना समजतात. मुलांच्या भावना,अपेक्षा, गरजा समजल्या की त्याच्या विकासासाठी काय करता येईल हे लक्षात येते तेव्हा बाल्याच्या विकासाचा निम्मा टप्पा आपण ओलांडलेला असतो. यातून मुलांसोबत कसे बोलावे, काय बोलावे, कोणते प्रसंग तयार करावेत, कोणत्या अडचणी आहेत,कोणते खेळ खेळावेत ,कोणते अनुभव सांगावेत अशा अनेक गोष्टीबाबत समजल्याने पालकांनाही दिशा मिळून जाते.
धन्यवाद 🙏🏻
*पालकत्वाच्या वाटा*
- *ज्ञानदेव नवसरे, नाशिक*
आपण अापल्या मुलांना अधिक आनंदी ,संस्कारित,सदृढ व जीवनात यश मिळवण्यासाठी काय काय करु शकतो?याचा विचार प्रत्येक पालक करत असेलच असे नाही. बहुतेक पालकांना स्वतः च्या व लेकरांच्या पोटाची खळगी भरण्याचीच चिंता असते तिथे पाल्याचा मानसिक, भावनिक ,सामाजिक विकासाच्यादृष्टीने प्रयत्न दूरच असतो.
माझा मुलगा चांगला व्हावा, हुशार व्हावा, समाजाभिमुख व्हावा यासाठी अगोदर पालकाने तसे घ्यावे लागते.पालकत्व हा महत्त्वाचा विषय पण पुरेशा वेळेअभावी अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात.
निसर्गतःच बालकाची वाढ होत असते. बालकांच्या स्वभावात वयानुसार काय बदल होतात?त्याच्या गरजा, अपेक्षा कोणत्या समजल्यानंतर बाल्याशी कशी वागावे यासाठी दिशा मिळते मग बालकाच्या गरजा ,अपेक्षा, समस्या कळायला नकोत का? मुले कोणत्या वयात लाजतात? कोणत्या वयाने 'नन्ना' चा पाढा गातात? हे अगोदरच पालकाला समजले तर मुलांशी जसे वागावे याबद्दल पालकांच्या मनात शंका उरत नाही.
आपण लहान असताना आई- वडील, आजी -आजोबा ,इतर घरातील माणसांनी आपल्याला कसं वाढवलं हे आपल्याला माहिती असतं? आणि आठवलं तरी आता जुने दिवस कुठं उरलेत ? आता कुटुंब विभक्त झालीत. कुटुंबापासून एकटी पडलीत .काहींना एकटे राहण्यात आनंद मिळतोय. एकदंरीत कुटुंबाचे स्वरूप आता बदललेले आहे.
पूर्वी घरातील आजी -आजोबा ,आई -वडील मुलांसाठी जितका वेळ द्यायची तितका आज मुलांसाठी वेळ दिला जात नाही त्यामुळे पाळणाघरे, बालसंस्कार अशा संकल्पना उदयास आल्या.
लहानपणी मुलांसाठी वेळ दिलाच पाहिजे पाहिजे कारण लहानपणी मुलांसाठी दिलेला वेळ हा बाल्याच्या विकासाची पायाभरणी आहे ,हे प्रत्यक्ष समजून घ्यायला हवे.
पूर्वी अंगाईगीते, बडबडगीते ही आईच्या आवाजातील असायची त्याची जागा आज मोबाईलातील बाईने घेतलीय. आईच्या आवाजातील संगीतविरहित अंगाईगीते ही मोबाईलमधील बाईच्या संगातासह गायलेल्या अंगाईपेक्षा शंभर पटीने भारीय. आईच्या अंगाईत आपुलकी,प्रेम,जिव्हाळा आहे ततसा मोबाईलच्या अंगाई गीतात कुठंय?बालकांच्या आई वडील किंवा घरातील इतरांचा होणारा स्पर्श आणि अावाज यातून सुरक्षिततेची भावना येत असते .त्यामुळे साधे गायनही बाळांना झोपी लावते. मोबाईलमध्ये अंगाईत लावून तासन् तास झोका द्यायची गरज उरत नाही. म्हणून पालकांनी किमान दोन -तीन अंगाईगीते पाठ करुन ठेवायला काय हरकत आहे ?
आत्ताच्या पालकांना प्रत्येक गोष्टी घाई झालीय.माझे बाळाचा विकास झपाट्याने व्हावा, माझे मूल इतरांपेक्षा हुशार व्हावे यासाठी रस्सीखेच सुरु असल्यासारखे वागतात. त्यासाठी बाजारातून कोणकोणत्या प्रकारचे साहित्य खरेदी करतात हे त्यांनाच माहिती. खरंतर बालकांची वाढ हा पूर्णतः निसर्गिक बाब आहे .बालकांच्या मानसिक, भावनिक विकासाच्यादृष्टीने मात्र आपल्याला प्रयत्न करतात येतात. बालकांच्या विकासाला पोषक वातावरण तयार करणे ,प्रसंग तयार करणे हे मात्र पालकाच्या हाती असते .
मुलांचा आहार,झोप,विश्रांती याकडे पालक कटाक्षाने लक्ष देत असतात तसेच लक्ष वयानुसार त्यांच्या गरजा, अपेक्षा, हालचाली, स्वभाव बदल, अडचणी याकडे पण लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे.
मूल लहान असो वा मोठे त्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे .मुलांच्या गरजा आणि भावना यांचा अत्यंत जवळचा संबंध असतो.मुलांच्या गरजा लक्षात आल्या की त्यांच्या वागण्यातील बदल लक्षात येतो त्यातूनच मुलांच्या भावना समजतात. मुलांच्या भावना,अपेक्षा, गरजा समजल्या की त्याच्या विकासासाठी काय करता येईल हे लक्षात येते तेव्हा बाल्याच्या विकासाचा निम्मा टप्पा आपण ओलांडलेला असतो. यातून मुलांसोबत कसे बोलावे, काय बोलावे, कोणते प्रसंग तयार करावेत, कोणत्या अडचणी आहेत,कोणते खेळ खेळावेत ,कोणते अनुभव सांगावेत अशा अनेक गोष्टीबाबत समजल्याने पालकांनाही दिशा मिळून जाते.
धन्यवाद 🙏🏻
Comments
Post a Comment