Skip to main content

शिक्षण प्रेरणादूत

 #प्रेरणादूत :- आशाबाई विजय जेजूरकर

            - जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव 

               सालाबादप्रमाणे या वर्षीही जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव येथे राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला आयोजित मी ज्ञानी होणार हा सामान्यज्ञानावर आधारित उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या उपक्रमामध्ये आमच्या शाळेतील एक शिक्षक दररोज फळ्यावर संस्थेमार्फत दिले जाणारे पाच प्रश्न लिहित असतो , शाळेच्या आवारात हा फळा मुलांना प्रश्न वहीत उतरून काढण्यासाठी ठेवला जात असतो.मुले वहीत लिहितात, दरमहिन्याला एक सराव चाचणी  परिक्षा घेतली हा नित्यक्रमे वर्षभर चालणारा आमचा कार्यक्रम. 

         शाळेतील ही प्रकिया घडत असताना याचा परिणाम शाळेतील आजूबाजूच्या घटकांवरही कसा होतो याचे हे उदाहरण आहे. आमच्या शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी असणाऱ्या शा.पो.आ चे काम पाहणाऱ्या आशाबाई विजय जेजूरकर  . सर्व विद्यार्थी , आम्ही शिक्षक त्यांना मामी म्हणतो. त्या  शाळेच्या आवारात ठेवलेल्या फळ्याचे वाचन नियमित करत असतात. दररोज लिहिलेले प्रश्न जाणून घेण्याची  मामींना जणू जिज्ञासाच  असते . आमच्यासोबत अधूनमधून विविध प्रश्नांची चर्चा करत असतात. मामींना फळा वाचनाची चांगलीच आवड तयार झालेली आहे.  

आज कवायत झाल्यानंतर नम्रता मॅडम, जाधव सर  यांनी सामान्यज्ञान चाचणीसाठी विद्यार्थी रांगेत आणि अंतरावर विद्यार्थी बसवले , पेपरचे वाटप केले. विद्यार्थी परिक्षा देण्यात गढून गेले होते. मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण सर मुलांचे पर्यवेक्षण करत होते. काही मुलांचे पेपर पूर्ण लिहूनही  झाले होते. त्यांनी पेपर जमा केले. बाकीच्या मुलांचे पेपर सोडवून होईपर्यंत जाधव सर, मी आणि नम्रता मॅडम पेपर चेक करत होतो. 

             दररोजचे प्रश्न वाचन करणाऱ्या मामींना प्रश्नपत्रिका जाणून घेण्यासाठी आमच्या जवळ आलेल्या होत्या. प्रश्नपत्रिका वाचन करत होत्या. आम्ही मामींना सहज शब्द टाकला मामी सोडवता का पेपर ? शिल्लक पेपर मामींना दिला. मामींनी दहा -पंधरा मिनिटात २५ गुणांचा पेपर सोडवून पुन्हा आमच्या जवळ हजर. "सर , तपासा माझा पेपर " पेपर जमा करून पुन्हा त्या आपल्या कामाला लागल्या. मुलांचे पेपर बाजूला करून मामींचा पेपर जाधव सरांनी तपासला , त्यांनी १२ प्रश्न अगदी अचूक सोडवले होते. मामींनी ना वहीत लिहिलेले ना परिक्षा आहे म्हणून प्रश्नांची उजळणी सराव केलेला तरीही इतके चांगले गुण  मिळवणे म्हणजे आमच्यासाठी नवलच  होते. 

खरोखरच मामींचे कौतुक करावे तितके कमीच आहे. मामींना वाचनाची भारी आवड आहे.घरच्या बिकट आणि कठीण परिस्थितीमुळे मामींना दहावी पर्यंतच शिक्षण घेता आले.शिक्षण जरी सुटले तरी माणूस शिकायचा थांबत नाही हे त्यांनी दाखवून दिले . 

          शाळेत सुरू असलेले उपक्रम, कार्यक्रम, कृती परिसरातील घटकांवरही परिणाम करत असते याचे हे एक उदाहरण आहे . मुलांना शिकण्याचे वातावरण तयार झाल्यावर मुले आपोआप शिकतात याचेही एक उदाहरण.मामींमुळे आपल्या जाणून घेता येईल की शिक्षण ही आपल्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल , प्रसंगाबद्दल  शिकण्याची प्रक्रिया आहे. हे आपल्याला कोणतीही वस्तू किंवा परिस्थिती सहजपणे समजून घेण्यास शिक्मषणामुळेमदत होत असते . शिक्षण आयुष्याला दिशा देते , संतुलन ठेवते. अशा शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या आमच्या मामींचे खुप कौतुक. आमच्या शाळेतील शैक्षणिक अनुभवांचा परिसरात घडणाऱ्या बदलांचा अनुभव आमच्यासाठी समाधानाचा आहे. 

धन्यवाद 🙏🏻

Comments

Popular posts from this blog

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा ..

*लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा..* www.Shikshanvichar.blogspot.in              अलीकडे  पाल्यांच्या विकासासाठी पालक मेहनत घेताना दिसत आहेत . पालकत्व म्हणून त्यांचे खुप कौतुकच करावे लागेल पण यामध्ये मुलांची गुणवत्ता, आवड निवड, त्याचे वय, क्षमता लक्षात घेऊन प्रयत्न करायला हवेत असे मला वाटते. जिथे मुलगा दोन वर्ष पूर्ण करतोय , नीट बोलायला लागत नाही तिथे आई बाप लेकराला नर्सरी वगैरे वर्गात कोंबतात. मुलांना अभ्यास करायचा ससेमिरा पाठीमागे लागण्याचे वातावरण घरोघरी तयार होताना दिसत आहे आणि ते भयानक आहे . नर्सरी, प्ले ग्रुप वगैरे या वर्गात टाकायला हरकत नाही पण तिथे त्याच गोष्टी व्हाव्यात ज्या घडायला हव्यात.  गाणी, खेळ या गोष्टींसाठी त्यांचा फायदाही होतोच. पण यासोबतच कमी वयाच्या याच लेकरांकडून पालकांच्या अपेक्षा वाढायला सुरु होतात . मुलाने लिहिले पाहिजे, वाचले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यासाठी अभ्यास घ्यायला सुरुवात होते. मुलांनी अभ्यास करावा असे पालकांना वाटू लागते. मुलांचा अभ्यास म्हणजे काय हो?  महागडी पुस्तके, वह्या , वर्कबुक ,सीड...

शिक्षण म्हणजे नुसती पोपटपंची नव्हे.

#पालकत्व      ✍🏻 ज्ञानदेव नवसरे आज मेन्स पार्लरच्या दुकानात बसलेलो होतो .त्याठिकाणी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे दोन पालक शेजारीच बसले होते (विशेष म्हणजे ते मराठी शाळेचे शिक्षकच अाहेत) . आज सुट्टी असल्याने त्यांच्या लेकरांना पण घेऊन आले होते. त्यांच्या चर्चा चालु होत्या. आमच्या सोम्याची शाळा अमुक करुन घेतेय ,दुसरा सांगता होता आमच्या गोम्याची शाळा तमूक करून घेतेय. सहज मुलांना प्रश्नही केले जात होते.  पाठांतरावर आ्दारित अअसणाऱ्या प्रश्नांची मुले सहज उत्तरे देत होती. एकमेकांकडून एकमेकांच्या लेकरांना शाबासकी ददेण्याचे काम सुरु होते.  मी शांतपणे सर्व ऎकून घेत होतो. माझ्या मनात विचार आला की मुलांची अशी पोपटपंची म्हणजे शिक्षण असे पालकांना वाटतेय का?  खरोखरच याला शिक्षण म्हणावे का ? खरंतर शिक्षण म्हणजे विकास, शिक्षण मम्गणजे सुसंस्कार , शिक्षण म्हणजे अभिव्यक्ती इतक्या व्यापक अर्थाने असणारा हा शब्द आज केवळ परिक्षा अन परीक्षेचे गुणदान यापुरता मर्यादित राहतोय का?  आणि त्याच दृष्टीने प्रयत्न म्हणजे केवळ परिक्षा तयारी च्या शिक्षण हे मुलांचा विकास त्यांच्या कल...