Skip to main content

मुलांना दिशा देऊयात


*मुलांना दिशा देऊयात* 
अाज नेहमीप्रमाणे शंभू खिदळून आला होता पण त्याच्या चेह-यावरील तेज कमालीचे होते. "आप्पा चला ना खेळायला जावू" शंभू लाडात येऊन बोलला. मी शाळेतून दमून आलो होतो.  "नको रे शंभू ,मी खुप दमलोय.
" आई सांग ना आप्पाला ." खरतर आमचं दोघांचं खेळणं म्हणजे भारीच असतयं. 
शंभूच्या खेळण्यांसोबत रमताना मलाही लहानपणाचा अनुभव घेता येत असतो.कधीकधी माझी बायको मला खुप हसते माझे बाळासोबत असतानाचे संवाद, चेह-यावरील हावभाव पाहून.😁
माझं लहान झालेलं पाहून शंंभू मात्र बिनधास्तपणे माझ्यासोबत खेळतो.
ब्लाॅक्स ची भरणी आम्ही खाली घेतली .दोघंही वेगवेगळे आकार बनवायला लागलो. मी गाडीचा आकार बनविला अन शंभूचे काम सुरूच होते. "काय बनवितोय शंभू?" मी म्हणालो. 
"मला घर बनवायचेय."  मी घराच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले अन त्यानेही सगळी उत्तरे दिली. "मला लय काही बी बनविता येते." शंभू बोलत होता. 
काय काय बनविता येते? बंदूक, गाडी,घर,शाळा ,पाटी ,माणूस. 
मी त्याचे कौतुक केले अन त्याला कवेत घेतले .यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांकडे गुण असतात ,शक्ती असते पण त्यांना वाव दिला जात नाही. अशा शंभूच्या अनेक गोष्टी असतील की ज्यांना मला अजून समजायच्या आहेत ,त्यासाठी त्याला वेळ द्यावा लागणार आहे आणि वेळ पाळून राहावीच लागणार आहे कारण मुलांच्या वाढत्या वयासोबत अन बदलत्या आवडीनिवडीसोबत मला जुळवून घ्यावे लागणार आहे.
   *मुलांकडे शक्ती असते पण ती वापरली जात नाही त्या शक्तीला दिशा दिली जात नाही पण दिशा देणं अत्यंत आवश्यक आहे.* मुलांची ही शक्ती कोणती अन कोणकोणत्या प्रकारच्या आहेत त्या शोधता यायला हव्यात. मग त्यावर काम करता येते.
अनेक मुले हायपर असतात ते शांत बसत नाहीत अशा वेळेस आपण त्यांना एक धपाटा मारून शांत करण्याचा प्रयत्न करतो किंवा घराच्या बाहेर घेऊनच जायचे नाही. लहान वयातील बांधलेले गायीचे वासरू एकदा का सोडले की त्याला समजत नाही कुठे धावायचे ,कसे धावायचे ते नुसतं पळत सुटते, उड्या मारते आपण जर घट्ट पकडले नाही तर आपल्याला पण घेऊन जाते त्यामुळे आपण त्याचा दोर सोडून देणं पसंत करतो. 
मुलांची शक्ती समजण्यासाठी मुलांना अगोदर समजून घेणं आवश्यक आहे म्हणून विद्यार्थ्यांना एखादी घटना ,गोष्ट, आशय शिकवायचा असेल तर अगोदर आपण विद्यार्थी व्हायला हवे. त्यामुळे मुलांच्या आवडीनिवडी ,भावना आणि त्यांचा हेतू आपल्या लक्षात येतो.
कोणती गोष्ट केल्यावर मुलांना आनंद होतो? काय केले ते मुलांना राग येतो?  कशामुळे मुले नाराज होतायेत?  का नाराज होतात?  त्यांना काय करावे वाटतेय ? त्यासाठी मुलांच्या दुनियेत आपण प्रवेश करायला हवा. हे पालक ,शिक्षक यांच्या लक्षात आले की मुलांसोबत बोलायला, अनुभव तयार करायला अन त्यांच्याशी जुळवून घ्यायला खुप सोपे जाते नंतर मुलांच्या आवडीनिवडी ,भावनांचा विचार करुन प्रसंग तयार करता येतात. त्यासाठी मुलांना वेळ दिला पाहिजे.
जसे मुलांना समजून घेण्यासाठी मूल बनावे लागते तसे मुलांना वेळ द्यायचा असेल तर मुलांच्या दुनियेत आपल्याला जावे लागते. त्यावेळेस ख-या अर्थाने मुलांच्या विकासाच्या पाऊलवाटेत आपण सोबत असतोय.
https://shikshanvichar.blogspot.com/2019/01/blog-post.html?m=1
धन्यवाद 🙏🏻

Comments

  1. खुप छान सर आपली निरीक्षण शक्ती वाखाणण्याजोगी आहे

    ReplyDelete
  2. सुंदर विचार

    ReplyDelete
  3. मी आपल्या मताशी सहमत आहे

    ReplyDelete
  4. सर आपण बालकाला ओळखण्यात तरबेज आहात फारच बारकाईने निरिक्षण करता

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

जबाबदारी विकासाची

#जबाबदारी_विकासाची व्यक्तीच्या वर्तनात अपेक्षित वर्तनबदल घडवून आणणारी ,सर्वांगीण विकास साधणारी स्वयंस्फूर्त, अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया म्हणजे शिक्षण ...शिक्षण प्रक्रिया कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू असते.  मुलांच्या अध्ययनास मदत करणाऱ्या या संस्थांवर असणारी जबाबदारी सर्वांनी समजून घेणे गरजेचे असते. विद्यार्थी विकासाची संपूर्ण जबाबदारी शाळाचीच आहे असे म्हणणे म्हणजे स्वतः च्या जबाबदारीतून काढता पाय घेणे . कुटुंबाने काढता पाय घेतला तर मुलांच्या अध्ययनाच्या आणि विकासाच्या गतीवर परिणाम घडून येतो. मूल हे समाजाचा एक अविभाज्य घटक आहे .समाजातील सकारात्मक व नकारात्मक वातावरणात वाढत असते. शाळा ,कुटुंब यांनी निरीक्षणातून मुलांच्या विकासाच्यादृष्टीने प्रयत्नास मदत भेटत असते. शाळेतील अनेक गोष्टी मुलं कुटुंब आणि समाजाकडून शिकत असते याउलट समाजातील अनेक गोष्टी शाळा अन कुटुंबासोबत शिकत असते. कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या पातळीवर विद्यार्थी विकासाचा राजमार्ग पालक व शिक्षकांनी लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास मुलांचा सर्वांगीण विकास करणे सोपे जाते असे मला...

अनुभवलेली लोकं

*मी अनुभवलेली लोकं* 📝 *ज्ञानदेव नवसरे* #Status ला *@बालसेवा देशविकासासाठी* लिहितात आणि *बालकांसाठी झटणा-यांचा व्देष* करतात. ही उलटदर्शी लोकं घातकच. # Status ला *@नाते_ऋणानुबंधाचे* लिहितात आणि *मैत्री करताना जात पाहतात* ही उलटदर्शी लोकं घातकच. #Statusला *समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानतात* आणि जो *समाजासाठी झगडतोय त्यांचा व्देष* करतात. ही उलटदर्शी लोकं घातकच. अशी *उलटदर्शी लोकं सुलटं काम करणारांनाच त्रास* देतात. #तात्पर्य  *माणसं जोडताना जात ,नातेसंबंध,फुकटची देशभक्ती नाही तर त्याचे इतरांसोबतचे नाते, त्याचे समाजासाठीचे काम आणि देशासाठीचे काम पहावे.* # *तुम्ही देशभक्त आहात  तुम्हाला कुणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही.* धन्यवाद🙏🏻