Skip to main content

निर्णयांची कसरत

😇☺ 🙆🏻  *निर्णयांची कसरत ...* 🙆🏻‍♂😊😇
          🖋 *ज्ञानदेव नवसरे* www.shikshanvichar.blogspot.in

             जया प्रथमच गाव सोडून बाहेर
गावी आमचं गाव , घर आणि घरातील माणसं सोडून इतर गावात (पेठ) पहिल्यांदाच राहत होती. सुरूवातीला मी घरी नसलो की तिच्या मनात असुक्षिततेची भिती वाटत असायची कारण तिच्यासाठी सर्व काही नवीनच होते. आमच्या शेजारला तिची काॅलेजातील मैत्रीण सीमा सोबत होती. सीमाचे मिस्टर शिक्षक असल्याने शेजारला राहत असायचे. जयाच्या ओळखीची मैत्रीण सोबत असल्याने मी बिनधास्तपणे शाळेवर जात असायचो. ती दुपारचे जेवण, बाजार, इतरांच्या ओळखी व्हाव्यात, बाजारहाट   सीमासोबतच करायची.
        पेठचा बाजार मंगळवारी अन गुरूवारी भरतो . पेठला चांगली भाजीमंडई होतीच . दररोज म्हटलं तरी भाजी विकत घेता येत होती पण शेतक-यांकडील चांगली भाजी मिळावी यासाठी ती बाजारदिवशी आठवडाभराचा बाजार करुन आणत असे.
           आईवडीलांना सोडून दोघांनीच राहायचेय अशी पहिलीच वेळ होती. नव-याला खुश करण्यासाठी नव-याच्या आवडीने स्वयंपाक करायचा ,त्यांच्या आवडीनिवडीनुसार भाज्या आणायच्या आणि नवरा म्हणेल तीच भाजी करायची असं तिनं मनात ठरवित होती की काय कुणास ठाऊक ?  तिला वाटायचं की अमुक भाजी केली तर त्यांना आवडेल की नाही ? म्हणून दररोज स्वयंपाक करताना मला अगोदर विचारायची, "आज कोणती भाजी करायची?" ती बाजारातून आणलेल्या सगळ्या भाज्यांची नावांची यादी सांगायची. जसा बाजारदिवस जवळ येईल तशी यादी कमी व्हायची कारण भाज्या संपत आलेल्या असायच्या. सुरुवातीचे काही दिवस तिने विचारले की पटकन कुठल्या तरी एका भाजीचे नाव घेऊन मी मोकळं व्हायचो. मला माहिती असायचं कोणती जरी भाजी बनवायला सांगितलं तरी ज्या बाजारातून आणल्यात त्याच बनवाव्या लागणार आहेत आणि हळूहळू सगळ्या भाज्या संपणारच आहेत. त्यामुळे भाजी सांगायला वेळ लागायचा नाही. 
           जयाला हळूहळू भाजी कोणती बनवायची यासाठी जसं मला नेहमीच विचारायची तसं इतर घरातील इतर  बाबीही मला विचारून करायला तिने सुरुवात केली होती. गावाकडे आई वडिलांसोबत राहतो त्यावेळी असं कधी घडत नसायचं. दोघांना घराबाहेर जायचे असेल तर कोणती साडी घालू ? नाष्ट्याला काय बनवायचे?  घरातील टेबल ,खुर्च्या इथं ठेवायच्या की तिथं ठेवायच्या ? अशाचप्रकारचे अनेक गोष्टी  विचारून करायला तिनं सुरुवात केली होती.
       तिची प्रत्येकवेळी एखादी गोष्ट विचारून करणे आवडत नसायचे कारण तिच्यातील निर्णयक्षमतेचा ती वापर करणे कमी करीत चाललीय हे माझ्या लक्षात येऊ लागले .
            खरंतर मोठ्यांमध्ये काय अन लहान मुलांमध्ये काय निर्णय घेण्याचा अभाव आढळतोच कारण निर्णयक्षमता विकसित झालेली नसते तर ती विकसित करण्याची बाब आहे. निर्णयक्षमता सवयीने आणि जबाबदारी स्वतः वर घेतल्याने विकसित होत असते.ज्यावेळी आपल्यावर लहान लहान जबाबदारी पडते तेव्हा त्यातून निर्णयक्षमता विकसित होते परिणामी मोठमोठे निर्णय घेतानाही अडचण येत नाही.
            जयाचे निर्णय तिने घ्यावेत असे मला सतत वाटायचे परंतु मला विचारून काम करायची  सवय काही जायला तयार नव्हती. शेवटी तिला समजावून सांगितले प्रत्येक वेळी लहान गोष्टींचे निर्णय माझ्यावर सोडून द्यायचे बंद करायला हवं. स्वतः चे निर्णय स्वतः घेत जा त्यासाठी अनेकवेळा तिला सांगावे लागले. तेव्हापासून मला न विचारता तिच्या आवडीचे कपडे घालून बाहेर जाणं असेल, भाजी बनविणे असेल किंवा घरातील इतर गोष्टी स्वतः करु लागली. स्वतः चे लहानसहान निर्णय घेऊ लागली. आयुष्यातील मोठे निर्णय घेताना अनुभवी लोकांची सल्लामसलत करायला हवी याची जाणीव ठेवावी लागते हे तिला ठाऊक होतेच.
          आपण विचार करायला लागतो त्यातून निर्णयक्षमता, नेतृत्वशैली विकसित होत असते हे आपल्याला मनात ठेवायला हवंय.
              शंभूचे देखील खेळताना मित्रांसोबत भांडणं होत असतात त्यावेळी आम्हाला सांगायला येत असतो परंतु त्यालाही आम्ही सांगत असतो की,  "तुझं तू पाहून घे बाबा". मुलांची बाजू घेऊन त्याचा निर्णय आपण घेतला की मुलं आणखी बिनधास्त होतात . पुन्हापुन्हा लहान गोष्टीसाठी आपल्याकडे येतात.
शंभू मोठा होऊ लागलाय.  आमचा नेहमीच कयास असतो की मुलाला आयतं मिळायला नकोय. मग ते निर्णय असो किंवा इतर बाबी. त्याचे अगदीच महत्त्वाचे आणि टोकाचे निर्णय असतात त्यावेळी लक्ष द्यावेच लागणार आहे पण त्यातही पूर्ण हस्तक्षेप न करता त्यालाच निर्णय घेण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न असतो.
           मुलांच्या किंवा आपल्या लहान कामात आयते निर्णयाचे कोलीत मिळतं राहिले तर मोठे निर्णय घेताना अडचणीत वाढ होते. ऎनवेळी मोठी बाब घडली किंवा करायची असेल त्यावेळी काय करावे ते सूचत नाही. माणसाला निर्णयक्षमतेचा विकास करण्यासाठी स्वतःची बुद्धी वापरून विचारशैली विकसित करावी लागते , निर्णय घेऊन त्यांचे पालन करावे लागते हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे ,असे मला वाटते.
धन्यवाद .

Comments

Popular posts from this blog

लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा ..

*लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा..* www.Shikshanvichar.blogspot.in              अलीकडे  पाल्यांच्या विकासासाठी पालक मेहनत घेताना दिसत आहेत . पालकत्व म्हणून त्यांचे खुप कौतुकच करावे लागेल पण यामध्ये मुलांची गुणवत्ता, आवड निवड, त्याचे वय, क्षमता लक्षात घेऊन प्रयत्न करायला हवेत असे मला वाटते. जिथे मुलगा दोन वर्ष पूर्ण करतोय , नीट बोलायला लागत नाही तिथे आई बाप लेकराला नर्सरी वगैरे वर्गात कोंबतात. मुलांना अभ्यास करायचा ससेमिरा पाठीमागे लागण्याचे वातावरण घरोघरी तयार होताना दिसत आहे आणि ते भयानक आहे . नर्सरी, प्ले ग्रुप वगैरे या वर्गात टाकायला हरकत नाही पण तिथे त्याच गोष्टी व्हाव्यात ज्या घडायला हव्यात.  गाणी, खेळ या गोष्टींसाठी त्यांचा फायदाही होतोच. पण यासोबतच कमी वयाच्या याच लेकरांकडून पालकांच्या अपेक्षा वाढायला सुरु होतात . मुलाने लिहिले पाहिजे, वाचले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यासाठी अभ्यास घ्यायला सुरुवात होते. मुलांनी अभ्यास करावा असे पालकांना वाटू लागते. मुलांचा अभ्यास म्हणजे काय हो?  महागडी पुस्तके, वह्या , वर्कबुक ,सीड...

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

शिक्षण म्हणजे नुसती पोपटपंची नव्हे.

#पालकत्व      ✍🏻 ज्ञानदेव नवसरे आज मेन्स पार्लरच्या दुकानात बसलेलो होतो .त्याठिकाणी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे दोन पालक शेजारीच बसले होते (विशेष म्हणजे ते मराठी शाळेचे शिक्षकच अाहेत) . आज सुट्टी असल्याने त्यांच्या लेकरांना पण घेऊन आले होते. त्यांच्या चर्चा चालु होत्या. आमच्या सोम्याची शाळा अमुक करुन घेतेय ,दुसरा सांगता होता आमच्या गोम्याची शाळा तमूक करून घेतेय. सहज मुलांना प्रश्नही केले जात होते.  पाठांतरावर आ्दारित अअसणाऱ्या प्रश्नांची मुले सहज उत्तरे देत होती. एकमेकांकडून एकमेकांच्या लेकरांना शाबासकी ददेण्याचे काम सुरु होते.  मी शांतपणे सर्व ऎकून घेत होतो. माझ्या मनात विचार आला की मुलांची अशी पोपटपंची म्हणजे शिक्षण असे पालकांना वाटतेय का?  खरोखरच याला शिक्षण म्हणावे का ? खरंतर शिक्षण म्हणजे विकास, शिक्षण मम्गणजे सुसंस्कार , शिक्षण म्हणजे अभिव्यक्ती इतक्या व्यापक अर्थाने असणारा हा शब्द आज केवळ परिक्षा अन परीक्षेचे गुणदान यापुरता मर्यादित राहतोय का?  आणि त्याच दृष्टीने प्रयत्न म्हणजे केवळ परिक्षा तयारी च्या शिक्षण हे मुलांचा विकास त्यांच्या कल...