😇☺ 🙆🏻 *निर्णयांची कसरत ...* 🙆🏻♂😊😇
🖋 *ज्ञानदेव नवसरे* www.shikshanvichar.blogspot.in
जया प्रथमच गाव सोडून बाहेर
गावी आमचं गाव , घर आणि घरातील माणसं सोडून इतर गावात (पेठ) पहिल्यांदाच राहत होती. सुरूवातीला मी घरी नसलो की तिच्या मनात असुक्षिततेची भिती वाटत असायची कारण तिच्यासाठी सर्व काही नवीनच होते. आमच्या शेजारला तिची काॅलेजातील मैत्रीण सीमा सोबत होती. सीमाचे मिस्टर शिक्षक असल्याने शेजारला राहत असायचे. जयाच्या ओळखीची मैत्रीण सोबत असल्याने मी बिनधास्तपणे शाळेवर जात असायचो. ती दुपारचे जेवण, बाजार, इतरांच्या ओळखी व्हाव्यात, बाजारहाट सीमासोबतच करायची.
पेठचा बाजार मंगळवारी अन गुरूवारी भरतो . पेठला चांगली भाजीमंडई होतीच . दररोज म्हटलं तरी भाजी विकत घेता येत होती पण शेतक-यांकडील चांगली भाजी मिळावी यासाठी ती बाजारदिवशी आठवडाभराचा बाजार करुन आणत असे.
आईवडीलांना सोडून दोघांनीच राहायचेय अशी पहिलीच वेळ होती. नव-याला खुश करण्यासाठी नव-याच्या आवडीने स्वयंपाक करायचा ,त्यांच्या आवडीनिवडीनुसार भाज्या आणायच्या आणि नवरा म्हणेल तीच भाजी करायची असं तिनं मनात ठरवित होती की काय कुणास ठाऊक ? तिला वाटायचं की अमुक भाजी केली तर त्यांना आवडेल की नाही ? म्हणून दररोज स्वयंपाक करताना मला अगोदर विचारायची, "आज कोणती भाजी करायची?" ती बाजारातून आणलेल्या सगळ्या भाज्यांची नावांची यादी सांगायची. जसा बाजारदिवस जवळ येईल तशी यादी कमी व्हायची कारण भाज्या संपत आलेल्या असायच्या. सुरुवातीचे काही दिवस तिने विचारले की पटकन कुठल्या तरी एका भाजीचे नाव घेऊन मी मोकळं व्हायचो. मला माहिती असायचं कोणती जरी भाजी बनवायला सांगितलं तरी ज्या बाजारातून आणल्यात त्याच बनवाव्या लागणार आहेत आणि हळूहळू सगळ्या भाज्या संपणारच आहेत. त्यामुळे भाजी सांगायला वेळ लागायचा नाही.
जयाला हळूहळू भाजी कोणती बनवायची यासाठी जसं मला नेहमीच विचारायची तसं इतर घरातील इतर बाबीही मला विचारून करायला तिने सुरुवात केली होती. गावाकडे आई वडिलांसोबत राहतो त्यावेळी असं कधी घडत नसायचं. दोघांना घराबाहेर जायचे असेल तर कोणती साडी घालू ? नाष्ट्याला काय बनवायचे? घरातील टेबल ,खुर्च्या इथं ठेवायच्या की तिथं ठेवायच्या ? अशाचप्रकारचे अनेक गोष्टी विचारून करायला तिनं सुरुवात केली होती.
तिची प्रत्येकवेळी एखादी गोष्ट विचारून करणे आवडत नसायचे कारण तिच्यातील निर्णयक्षमतेचा ती वापर करणे कमी करीत चाललीय हे माझ्या लक्षात येऊ लागले .
खरंतर मोठ्यांमध्ये काय अन लहान मुलांमध्ये काय निर्णय घेण्याचा अभाव आढळतोच कारण निर्णयक्षमता विकसित झालेली नसते तर ती विकसित करण्याची बाब आहे. निर्णयक्षमता सवयीने आणि जबाबदारी स्वतः वर घेतल्याने विकसित होत असते.ज्यावेळी आपल्यावर लहान लहान जबाबदारी पडते तेव्हा त्यातून निर्णयक्षमता विकसित होते परिणामी मोठमोठे निर्णय घेतानाही अडचण येत नाही.
जयाचे निर्णय तिने घ्यावेत असे मला सतत वाटायचे परंतु मला विचारून काम करायची सवय काही जायला तयार नव्हती. शेवटी तिला समजावून सांगितले प्रत्येक वेळी लहान गोष्टींचे निर्णय माझ्यावर सोडून द्यायचे बंद करायला हवं. स्वतः चे निर्णय स्वतः घेत जा त्यासाठी अनेकवेळा तिला सांगावे लागले. तेव्हापासून मला न विचारता तिच्या आवडीचे कपडे घालून बाहेर जाणं असेल, भाजी बनविणे असेल किंवा घरातील इतर गोष्टी स्वतः करु लागली. स्वतः चे लहानसहान निर्णय घेऊ लागली. आयुष्यातील मोठे निर्णय घेताना अनुभवी लोकांची सल्लामसलत करायला हवी याची जाणीव ठेवावी लागते हे तिला ठाऊक होतेच.
आपण विचार करायला लागतो त्यातून निर्णयक्षमता, नेतृत्वशैली विकसित होत असते हे आपल्याला मनात ठेवायला हवंय.
शंभूचे देखील खेळताना मित्रांसोबत भांडणं होत असतात त्यावेळी आम्हाला सांगायला येत असतो परंतु त्यालाही आम्ही सांगत असतो की, "तुझं तू पाहून घे बाबा". मुलांची बाजू घेऊन त्याचा निर्णय आपण घेतला की मुलं आणखी बिनधास्त होतात . पुन्हापुन्हा लहान गोष्टीसाठी आपल्याकडे येतात.
शंभू मोठा होऊ लागलाय. आमचा नेहमीच कयास असतो की मुलाला आयतं मिळायला नकोय. मग ते निर्णय असो किंवा इतर बाबी. त्याचे अगदीच महत्त्वाचे आणि टोकाचे निर्णय असतात त्यावेळी लक्ष द्यावेच लागणार आहे पण त्यातही पूर्ण हस्तक्षेप न करता त्यालाच निर्णय घेण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न असतो.
मुलांच्या किंवा आपल्या लहान कामात आयते निर्णयाचे कोलीत मिळतं राहिले तर मोठे निर्णय घेताना अडचणीत वाढ होते. ऎनवेळी मोठी बाब घडली किंवा करायची असेल त्यावेळी काय करावे ते सूचत नाही. माणसाला निर्णयक्षमतेचा विकास करण्यासाठी स्वतःची बुद्धी वापरून विचारशैली विकसित करावी लागते , निर्णय घेऊन त्यांचे पालन करावे लागते हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे ,असे मला वाटते.
धन्यवाद .
🖋 *ज्ञानदेव नवसरे* www.shikshanvichar.blogspot.in
जया प्रथमच गाव सोडून बाहेर
गावी आमचं गाव , घर आणि घरातील माणसं सोडून इतर गावात (पेठ) पहिल्यांदाच राहत होती. सुरूवातीला मी घरी नसलो की तिच्या मनात असुक्षिततेची भिती वाटत असायची कारण तिच्यासाठी सर्व काही नवीनच होते. आमच्या शेजारला तिची काॅलेजातील मैत्रीण सीमा सोबत होती. सीमाचे मिस्टर शिक्षक असल्याने शेजारला राहत असायचे. जयाच्या ओळखीची मैत्रीण सोबत असल्याने मी बिनधास्तपणे शाळेवर जात असायचो. ती दुपारचे जेवण, बाजार, इतरांच्या ओळखी व्हाव्यात, बाजारहाट सीमासोबतच करायची.
पेठचा बाजार मंगळवारी अन गुरूवारी भरतो . पेठला चांगली भाजीमंडई होतीच . दररोज म्हटलं तरी भाजी विकत घेता येत होती पण शेतक-यांकडील चांगली भाजी मिळावी यासाठी ती बाजारदिवशी आठवडाभराचा बाजार करुन आणत असे.
आईवडीलांना सोडून दोघांनीच राहायचेय अशी पहिलीच वेळ होती. नव-याला खुश करण्यासाठी नव-याच्या आवडीने स्वयंपाक करायचा ,त्यांच्या आवडीनिवडीनुसार भाज्या आणायच्या आणि नवरा म्हणेल तीच भाजी करायची असं तिनं मनात ठरवित होती की काय कुणास ठाऊक ? तिला वाटायचं की अमुक भाजी केली तर त्यांना आवडेल की नाही ? म्हणून दररोज स्वयंपाक करताना मला अगोदर विचारायची, "आज कोणती भाजी करायची?" ती बाजारातून आणलेल्या सगळ्या भाज्यांची नावांची यादी सांगायची. जसा बाजारदिवस जवळ येईल तशी यादी कमी व्हायची कारण भाज्या संपत आलेल्या असायच्या. सुरुवातीचे काही दिवस तिने विचारले की पटकन कुठल्या तरी एका भाजीचे नाव घेऊन मी मोकळं व्हायचो. मला माहिती असायचं कोणती जरी भाजी बनवायला सांगितलं तरी ज्या बाजारातून आणल्यात त्याच बनवाव्या लागणार आहेत आणि हळूहळू सगळ्या भाज्या संपणारच आहेत. त्यामुळे भाजी सांगायला वेळ लागायचा नाही.
जयाला हळूहळू भाजी कोणती बनवायची यासाठी जसं मला नेहमीच विचारायची तसं इतर घरातील इतर बाबीही मला विचारून करायला तिने सुरुवात केली होती. गावाकडे आई वडिलांसोबत राहतो त्यावेळी असं कधी घडत नसायचं. दोघांना घराबाहेर जायचे असेल तर कोणती साडी घालू ? नाष्ट्याला काय बनवायचे? घरातील टेबल ,खुर्च्या इथं ठेवायच्या की तिथं ठेवायच्या ? अशाचप्रकारचे अनेक गोष्टी विचारून करायला तिनं सुरुवात केली होती.
तिची प्रत्येकवेळी एखादी गोष्ट विचारून करणे आवडत नसायचे कारण तिच्यातील निर्णयक्षमतेचा ती वापर करणे कमी करीत चाललीय हे माझ्या लक्षात येऊ लागले .
खरंतर मोठ्यांमध्ये काय अन लहान मुलांमध्ये काय निर्णय घेण्याचा अभाव आढळतोच कारण निर्णयक्षमता विकसित झालेली नसते तर ती विकसित करण्याची बाब आहे. निर्णयक्षमता सवयीने आणि जबाबदारी स्वतः वर घेतल्याने विकसित होत असते.ज्यावेळी आपल्यावर लहान लहान जबाबदारी पडते तेव्हा त्यातून निर्णयक्षमता विकसित होते परिणामी मोठमोठे निर्णय घेतानाही अडचण येत नाही.
जयाचे निर्णय तिने घ्यावेत असे मला सतत वाटायचे परंतु मला विचारून काम करायची सवय काही जायला तयार नव्हती. शेवटी तिला समजावून सांगितले प्रत्येक वेळी लहान गोष्टींचे निर्णय माझ्यावर सोडून द्यायचे बंद करायला हवं. स्वतः चे निर्णय स्वतः घेत जा त्यासाठी अनेकवेळा तिला सांगावे लागले. तेव्हापासून मला न विचारता तिच्या आवडीचे कपडे घालून बाहेर जाणं असेल, भाजी बनविणे असेल किंवा घरातील इतर गोष्टी स्वतः करु लागली. स्वतः चे लहानसहान निर्णय घेऊ लागली. आयुष्यातील मोठे निर्णय घेताना अनुभवी लोकांची सल्लामसलत करायला हवी याची जाणीव ठेवावी लागते हे तिला ठाऊक होतेच.
आपण विचार करायला लागतो त्यातून निर्णयक्षमता, नेतृत्वशैली विकसित होत असते हे आपल्याला मनात ठेवायला हवंय.
शंभूचे देखील खेळताना मित्रांसोबत भांडणं होत असतात त्यावेळी आम्हाला सांगायला येत असतो परंतु त्यालाही आम्ही सांगत असतो की, "तुझं तू पाहून घे बाबा". मुलांची बाजू घेऊन त्याचा निर्णय आपण घेतला की मुलं आणखी बिनधास्त होतात . पुन्हापुन्हा लहान गोष्टीसाठी आपल्याकडे येतात.
शंभू मोठा होऊ लागलाय. आमचा नेहमीच कयास असतो की मुलाला आयतं मिळायला नकोय. मग ते निर्णय असो किंवा इतर बाबी. त्याचे अगदीच महत्त्वाचे आणि टोकाचे निर्णय असतात त्यावेळी लक्ष द्यावेच लागणार आहे पण त्यातही पूर्ण हस्तक्षेप न करता त्यालाच निर्णय घेण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न असतो.
मुलांच्या किंवा आपल्या लहान कामात आयते निर्णयाचे कोलीत मिळतं राहिले तर मोठे निर्णय घेताना अडचणीत वाढ होते. ऎनवेळी मोठी बाब घडली किंवा करायची असेल त्यावेळी काय करावे ते सूचत नाही. माणसाला निर्णयक्षमतेचा विकास करण्यासाठी स्वतःची बुद्धी वापरून विचारशैली विकसित करावी लागते , निर्णय घेऊन त्यांचे पालन करावे लागते हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे ,असे मला वाटते.
धन्यवाद .
Comments
Post a Comment