Skip to main content

सहनशक्तीचा डाव

😡😥🤩 *सहनशक्तीचा डाव* 🤩😥😡
                     🖋 *ज्ञानदेव नवसरे*   
        www.Shikshanvichar.blogspot.in

          मुलांना खेळायला आवडते .खेळताना जिंकायला आवडते. मुले खेळात जिंकण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. जीव ओतून खेळतात पण इतके करुनही हार मिळाली की कासावीस होतात.एकमेकांवर राग करायला सुरुवात करतात.
            अध्यक्ष चषकाच्या स्पर्धांच्या तयारीसाठी शाळेत इयत्ता सहावी- सातवी कबड्डीचा सराव आमचे पदवीधर शिक्षक रामेश्वर जाधव सर घेत असायचे. एका शनिवारी त्यांना कामामुळे शाळेवर उपस्थित राहता आले नाही.
          अध्यक्ष चषक स्पर्धा जवळ येतेय, मुलांचा चांगला सराव व्हावा  यासाठी खेळाडूंना मैदानावर घेऊन जावे लागले.मुलांनी त्यांच्या पद्धतीने दोन गटात विभागणी करुन घेतली. एक गट दुस-यापेक्षा जास्तच सरस झाला होता.सातवीचा सचिन जेजुरकर त्यांचे नेतृत्व करत होता. पाच पाच मिनिटाचे दोन सामने झाले पण सचिनच्या गटानेच विजश्री खेचून आणली. माझ्या लक्षात आले की दोन्हीकडं सारख्याच ताकदीचे तुल्यबल खेळाडू असायला हवेत म्हणून थोडा बदल करत सचिनच्या गटातील दोघांची अदलाबदली केली. आता सामन्यात आणखी रंगत येऊ लागली. दोन्हीबाजूंनी सामना जिंकायची रस्सीखेच सुरु झाली. प्रत्येकजण स्वतः चा संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करु लागला. आम्हीच जिंकू असा विश्वास सचिनला वाटायचा कारण तो स्वतः पण चांगला खेळ करतो. यावेळी मात्र सचिनच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा मीच जिंकेल या विश्वासाने नव्याने दुसरा सामना खेळायला सुरुवात झाली पण पुन्हा पराभव झाला.
दोन वेळा पराभव स्वीकारलेल्या सचिनचे लक्ष सोबतच्या खेळांडूवर गेले. त्याने पराभव झाल्यानंतर  इतरांवर चिडायला सुरुवात केली. सहकारी खेळाडूंच्या खेळाचा त्याला राग येऊ लागला. नीट खेळा म्हणून ओरडायला लागला.सहकारी खेळाडूंना भलतंसलतं बोलायला सुरुवात केली. दोन्ही संघ प्रत्येकी दोन डाव जिंकला होता.
           नवीन डाव सुरु करण्याअगोदर सर्वांना जवळ घेतले अन समाजवून सांगितले. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा खेळातही हार अन जीत असतेच. आज दुसरा जिंकला तर उद्या तुम्ही जिंकत असता . खेळावरील लक्ष, सराव, जिंकण्याची जिद्द, समूहकृतीतून तुम्ही जिंकता आणि आनंद साजरा करतात. खेळातील आनंद जसा आवडतो तसा पराभव झाल्यावर समूहभावनेतून त्या सहन करायला सुद्धा आवडायला हवे,  शिकायला हवे. यश मिळाले तर माझ्यामुळे अन पराभव झाला तर सहका-यांकडे पाहण्याची सवय आपल्याला निराशाकडे घेऊन जाते. आपल्या संघाची हार झाली तर आणखी जिद्द,चिकाटी अन एकसंघ खेळून पुन्हा विजश्री आणता येईल कारण हार के आगे जीत है | यातूनच तुमची सहनशक्ती विकसित होणार आहे .
            सहनशक्ती विकसित झाली की भविष्यातील अडचणींना सामोरे जाताना अडचण येत नाही. आपण अडचण सोडविण्यात यशस्वी नाही झालो तर त्यासाठी सहनशक्ती वाढवू शकतो त्यामुळे भविष्यात नैराश्य येत नाही.
            ज्यावेळी मुले हसत हसत हार पचवायला लागतात त्यावेळी त्यांच्यातील खिलाडूवृत्ती अाणखी विकसित होत असते ,ही एक चांगली सवय आहे. स्वतः ची दुबळी सहनशक्ती संपल्यामुळे जगभरातील अनेक लोकं जीवनातील समस्यांना ,दुखांना , अडचणींचा सामोरे जाताना स्वतः ची जीवन यात्रा संपवत आहेत . खरंतर अशा खेळाच्या प्रसंगातून मुलांना भविष्यातील अनेक बाबींबद्दल सजग करता येत असते. विद्यार्थ्यांना अनुभव देताना स्वतःलाही समृद्ध बनवता येते.

धन्यवाद ...

Comments

Popular posts from this blog

रंगू आत्मविश्वासाच्या रंगी

*रंगू आत्मविश्वाच्या रंगी*                  - ज्ञानदेव नवसरे                        आत्मविश्वास ही विजयाची चावी आहे . आत्मविश्वास असेल तर विजय पायाशी लोळण घेतो हे विद्यार्थी दशेपासून अनुभवत आलो आहोत. एखादी गोष्ट करताना, बोलताना  आत्मविश्वास खुप महत्त्वाचा असतो. आपल्यात एखाद्या गोष्टीतील आत्मविश्वास विकसित होताना  आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा पगडा असतोय.                    महाराष्ट्रात येवल्याचा पतंगोत्सव प्रसिद्ध आहे.इथे पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गेल्या आठ -पंधरा दिवसांपासून बच्चे कंपनी पतंगोत्सवाची लगबग सुरु होती आणि आज मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. आमच्या शेजारला राहणाऱ्या दिगांबर यादव सरांचा मुलगा दादूची अन शंभूची खुप छान गट्टी आहे. तो शंभुपेक्षा मोठा आहे वय अन अनुभवाने सुद्धा. मुलं घरातील अन बाहेरील अनुकरणातून ब-याच गोष्टी शिकत असतात तसे शंभू देखील दादूकडून अनेक गोष्टी शिकत असतो. पतंग ,रीळ, मांजा...

माझा पाडा ,माझे विद्यार्थी

 *माझा पाडा, माझे लोक, माझे विद्यार्थी*     - ज्ञानदेव नवसरे        पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील सेवा हा आयुष्यभर न विसरता येणारा ठेवा आहे .पेठच्या पश्चिमेस १० किमी अंतरावर गुजरात सरहद्दीवर असणारे डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टुमदार असा कळमपाडा माझ्या सुरूवातीच्या सात वर्षांच्या नोकरीचा न विसरता येणारा महत्त्वाचा टप्पा होता.            कोराना कालावधीमुळे लांबणीवर पडलेली आमची कळमपाडा शाळेचे भेट आज धामणगाव शाळेच्या टीमसोबत  झाली.           कळमपाडा हे निसर्गाने जितके नटलेलं आहे त्यापेक्षा जास्त या पाड्यामध्ये राहणाऱ्या माझ्यासारख्या पर-जिल्ह्यातून आलेल्या लेकरावरं स्वतःच्या लेकराइतकं, भावाइतकं प्रेम करणाऱ्या माझ्या ह्रदयस्पर्शी लोकांचं हे गाव आहे. माझ्याबद्दल कळमपाड्यातील लोकं काय बोलतात हे कळमपाड्यातील लोकं , माझे विद्यार्थी बोलतील ,याबद्दल मी काय बोलणार ?               काम करणा-या शिक्षकांच्या कामाचा सन्मान कसा करावा हे आमच्या कळमप...

मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत

* मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत ....* 📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक* फोटो सौजन्य : Google              आज पहिलीच्या मुलांना मुक्त चित्र काढण्यासाठी कोरे कागद दिले होते. मी फळ्यावर फुले,बादली, ग्लास, फुलपाखरू यांचे सोप्या पद्धतीने काढलेली चित्रे फळ्यावर रेखाटली होती.      सचिन ने काढलेले चित्र मला दाखवले. मी म्हणालो,"हे काय आहे ?" सचिन, "हे भूताचे , हे माझे आणि हे माझ्या घराचे चित्र आहे". मी म्हटले, छान काढलेय. मुलांनी सचिनचे चित्र पाहायला लगबग केली. सचिनच्या जवळ मुलांचा गलका जमा झाला. त्यांच्यात भुतांच्या गोष्टी वर गप्पा सुरू झाल्या. भूत अमुक असतं ,तमुक असतं आणि ब-याच गोष्टी चालू होत्या.माझ्या इयत्ता चौथीचा इंग्रजी विषय असल्याने मी पेपर तपासत असताना मुलांमधील सुरु असणा-या गप्पांकडे लक्ष जात होतेच.थोडा वेळ थांबून ऎकून घेतले. गावात म्हसोबाचे मंदीर आहे त्या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जातेय. भूत म्हणले की देव आलाच त्यामुळे म्हसोबावर बोलत होते. म्हसोबावर कडे हातात घातले की भूत काय बी करत नाय. माझी आई म्हसोबाला  दिवा लावते ...