*# भूमिका बदलाचा खेळ*
संध्याकाळी शाळेतून आल्यावर किंवा थोपण्याआधी शंभूबाळासोबत अर्धा-एक तास खेळ चालू असतोच. ब्लाॅक्स,चित्रांचा खेळ ,गाड्या वगैरे खेळणीसोबत खेळ तर चालूच असतात. शंभू चा प्रतिसाद घेण्यासाठी भूमिका बदलाचा खेळ हा माझा त्याच्यासोबतचा आवडता खेळ आलेला आहे.
यामध्ये शंभु अनेक भूमिका घेत असतो. कधी भेळवाला ,कधी भाजीवाला ,कधी डाॅक्टर तर कधी माझी आई होत असतो.
शंभुची माझ्या आईची भूमिका म्हणजे माझ्यासाठी आनंदाचा तितकाच मजेचा खेळ असतो. मला पुन्हा लहानपण जगता येते.यामुळे मला फायदाही होत असतो. आईच्या किंवा इतर भूमिकेत बाळ जेव्हा बोलत असते तेव्हा त्याचीच विचारशैली विकसित होत असते.गमतीत खेळत असलेला खेळ माझ्या अनेक समस्यांना उत्तर देत असतो. खरतर संस्कार घडताना अशा गमतीदार मार्गांचा उपयोग फायद्याचा ठरतो कारण अशा प्रसंगातून संस्कार घडले जातात ते लादले जात नाहीत.आपण मुलांकडून अपेक्षा करतो की मुलांनी चांगलं वागावं. एका अंगाने विचार न करता वेगळा विचार करावा .
यासाठी अापल्याही यातून जावे लागते . म्हणून याला मुलांचा संस्कार विकास, बुद्धीचा विकास म्हणजे पालकाचा विकास असेही म्हणता येते.
आपल्या मुलाला हुशार, स्मार्ट, बुद्धिमान, संस्कारित बनवायचे असेल तर सुरुवात स्वतः पासून करावी लागेल.आपण वेगळ्या पद्धतीने विचार करत गेलो की पाल्य सुद्धा आपोआप त्याच्यासमोर मुलांचा विकास घडताना दिसत असतो.
गेल्या वर्षी काढलेला मी लेकरु अन शंभु आई चा व्हिडिओ मी नेहमी पाहत असतो. त्यातून आनंद तर होतोच शिवाय लेकराला लेकराचं कौतुक पण वाटते.
ब-याच वेळा अनेकांना नोकरी अन धावपळीच्या जीवनात लेकरांसोबत खेळायला ,बोलायला वेळ मिळत नाही. अशी लेकरं एककल्ली होण्याची भिती असतेच. लहानपणी मुलांसाठी दिलेला वेळ ही मुलांच्या विकासासाठीची पायाभरणी असते.
धन्यवाद.
*-ज्ञानदेव नवसरे, नाशिक*
संध्याकाळी शाळेतून आल्यावर किंवा थोपण्याआधी शंभूबाळासोबत अर्धा-एक तास खेळ चालू असतोच. ब्लाॅक्स,चित्रांचा खेळ ,गाड्या वगैरे खेळणीसोबत खेळ तर चालूच असतात. शंभू चा प्रतिसाद घेण्यासाठी भूमिका बदलाचा खेळ हा माझा त्याच्यासोबतचा आवडता खेळ आलेला आहे.
यामध्ये शंभु अनेक भूमिका घेत असतो. कधी भेळवाला ,कधी भाजीवाला ,कधी डाॅक्टर तर कधी माझी आई होत असतो.
शंभुची माझ्या आईची भूमिका म्हणजे माझ्यासाठी आनंदाचा तितकाच मजेचा खेळ असतो. मला पुन्हा लहानपण जगता येते.यामुळे मला फायदाही होत असतो. आईच्या किंवा इतर भूमिकेत बाळ जेव्हा बोलत असते तेव्हा त्याचीच विचारशैली विकसित होत असते.गमतीत खेळत असलेला खेळ माझ्या अनेक समस्यांना उत्तर देत असतो. खरतर संस्कार घडताना अशा गमतीदार मार्गांचा उपयोग फायद्याचा ठरतो कारण अशा प्रसंगातून संस्कार घडले जातात ते लादले जात नाहीत.आपण मुलांकडून अपेक्षा करतो की मुलांनी चांगलं वागावं. एका अंगाने विचार न करता वेगळा विचार करावा .
यासाठी अापल्याही यातून जावे लागते . म्हणून याला मुलांचा संस्कार विकास, बुद्धीचा विकास म्हणजे पालकाचा विकास असेही म्हणता येते.
आपल्या मुलाला हुशार, स्मार्ट, बुद्धिमान, संस्कारित बनवायचे असेल तर सुरुवात स्वतः पासून करावी लागेल.आपण वेगळ्या पद्धतीने विचार करत गेलो की पाल्य सुद्धा आपोआप त्याच्यासमोर मुलांचा विकास घडताना दिसत असतो.
गेल्या वर्षी काढलेला मी लेकरु अन शंभु आई चा व्हिडिओ मी नेहमी पाहत असतो. त्यातून आनंद तर होतोच शिवाय लेकराला लेकराचं कौतुक पण वाटते.
ब-याच वेळा अनेकांना नोकरी अन धावपळीच्या जीवनात लेकरांसोबत खेळायला ,बोलायला वेळ मिळत नाही. अशी लेकरं एककल्ली होण्याची भिती असतेच. लहानपणी मुलांसाठी दिलेला वेळ ही मुलांच्या विकासासाठीची पायाभरणी असते.
धन्यवाद.
*-ज्ञानदेव नवसरे, नाशिक*
Comments
Post a Comment