Skip to main content

मुलांना समजून घेताना घाई कशाला?

# *मुलांना समजून घेताना घाई कशाला?*

रविवारचा दिवस होता. माझा Laptop ची बॅटरी प्रोबलेम आणि इतर updated software घेण्यासाठी दुकानात गेलो होतो. माझ्या लॅपीचे काम होईपर्यंत मी खुर्चीत बसलेलो होतो. तिथे आलेल्या काही जणांसोबत शिक्षण ,विद्यार्थी ,शाळा यावर गप्पा सुरु होत्या. त्यातील एक प्रसंग लिहावा वाटला.  एकजण बोलत होते माझ्या वर्गातील काही मुले अजिबात बोलत नाहीत.एकदम शांत बसून घेतात.आपण पन्नास वाक्य बोलावी तेव्हा ते एक वाक्य बोलतात बाकी ढिम्म बघत बसतात. ते विद्यार्थी बोलले नाहीत. त्यांचा स्वभाव कसा कळेल? त्याच्या मनात काय चाललेय, हे कसं कळेल?आणि मला कळल्याशिवाय मी त्यांना काय सांगू?  ते एकदम शांत बसतात म्हणजे ते ढिम्म आहेत ,म्हणजे ते ढ आहे त्यांची बुद्दीची चालत नाही असे त्यांचे मत येत होते.
 खरतर वास्तवात तसे नसतेही. कारण स्वभाव आणि बुद्धिमत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं समजलं जातं . अनेकदा आपण तक्रार करत असतो की अमुक्याचा स्वभाव असा आहे ,त्याला मी काय करणार?  त्याची बुद्धिमत्ता कमी आहे त्याला मी काय करणार.परंतु स्वभाव आणि बुद्धिमत्ता यांना जोडणारी गोष्ट म्हणजे त्याची विचारशैली. आपण जेव्हा एखाद्याचा स्वभाव अमुक आहे तमुक आहे असे म्हणतो त्यावेळी त्याची विचारशैली तशी आहे . मुलांच्यावर काय सर्वांच्या विचार करायच्या पद्धतीवर माणसाचा स्वभाव ठरत असतो आणि त्यातून बुद्धिमत्ता प्रकट होत असते. म्हणून मुलांचा स्वभाव समजला की त्याची विचारशैली समजेल आणि वैचारशैली समजली की आपण कोणत्या प्रसंगात त्यांच्याशि कसे वागता येईल ते समजणे सोपे जाईल. ज्यावेळी आपल्याला मुलांचा स्वभाव, वैचारशैली न समजल्यामुळे वरील प्रकारच्या तक्रारी आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात.
मूल समजून घेणे ही हवी तितकी गोष्ट सोपी नाहीच आहे पण समजून घेण्याचा प्रयत्न करुन त्यादृष्टीने पाऊल उचलत जायला हवे. एखाद्याच्या स्वभावावरुन विचारशैली समजून घेऊयात आणि मग त्याची बुद्धिमत्ता ठरवूयात.
एखाद्याची विचारशैली समजून न घेता त्याच्या बुद्धीमत्तेसंबंधी काढलेला निष्कर्ष घाईचा होईल असे मला वाटते. 
- *ज्ञानदेव नवसरे, नाशिक*

Comments

Popular posts from this blog

रंगू आत्मविश्वासाच्या रंगी

*रंगू आत्मविश्वाच्या रंगी*                  - ज्ञानदेव नवसरे                        आत्मविश्वास ही विजयाची चावी आहे . आत्मविश्वास असेल तर विजय पायाशी लोळण घेतो हे विद्यार्थी दशेपासून अनुभवत आलो आहोत. एखादी गोष्ट करताना, बोलताना  आत्मविश्वास खुप महत्त्वाचा असतो. आपल्यात एखाद्या गोष्टीतील आत्मविश्वास विकसित होताना  आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा पगडा असतोय.                    महाराष्ट्रात येवल्याचा पतंगोत्सव प्रसिद्ध आहे.इथे पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गेल्या आठ -पंधरा दिवसांपासून बच्चे कंपनी पतंगोत्सवाची लगबग सुरु होती आणि आज मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. आमच्या शेजारला राहणाऱ्या दिगांबर यादव सरांचा मुलगा दादूची अन शंभूची खुप छान गट्टी आहे. तो शंभुपेक्षा मोठा आहे वय अन अनुभवाने सुद्धा. मुलं घरातील अन बाहेरील अनुकरणातून ब-याच गोष्टी शिकत असतात तसे शंभू देखील दादूकडून अनेक गोष्टी शिकत असतो. पतंग ,रीळ, मांजा...

माझा पाडा ,माझे विद्यार्थी

 *माझा पाडा, माझे लोक, माझे विद्यार्थी*     - ज्ञानदेव नवसरे        पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील सेवा हा आयुष्यभर न विसरता येणारा ठेवा आहे .पेठच्या पश्चिमेस १० किमी अंतरावर गुजरात सरहद्दीवर असणारे डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टुमदार असा कळमपाडा माझ्या सुरूवातीच्या सात वर्षांच्या नोकरीचा न विसरता येणारा महत्त्वाचा टप्पा होता.            कोराना कालावधीमुळे लांबणीवर पडलेली आमची कळमपाडा शाळेचे भेट आज धामणगाव शाळेच्या टीमसोबत  झाली.           कळमपाडा हे निसर्गाने जितके नटलेलं आहे त्यापेक्षा जास्त या पाड्यामध्ये राहणाऱ्या माझ्यासारख्या पर-जिल्ह्यातून आलेल्या लेकरावरं स्वतःच्या लेकराइतकं, भावाइतकं प्रेम करणाऱ्या माझ्या ह्रदयस्पर्शी लोकांचं हे गाव आहे. माझ्याबद्दल कळमपाड्यातील लोकं काय बोलतात हे कळमपाड्यातील लोकं , माझे विद्यार्थी बोलतील ,याबद्दल मी काय बोलणार ?               काम करणा-या शिक्षकांच्या कामाचा सन्मान कसा करावा हे आमच्या कळमप...

मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत

* मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत ....* 📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक* फोटो सौजन्य : Google              आज पहिलीच्या मुलांना मुक्त चित्र काढण्यासाठी कोरे कागद दिले होते. मी फळ्यावर फुले,बादली, ग्लास, फुलपाखरू यांचे सोप्या पद्धतीने काढलेली चित्रे फळ्यावर रेखाटली होती.      सचिन ने काढलेले चित्र मला दाखवले. मी म्हणालो,"हे काय आहे ?" सचिन, "हे भूताचे , हे माझे आणि हे माझ्या घराचे चित्र आहे". मी म्हटले, छान काढलेय. मुलांनी सचिनचे चित्र पाहायला लगबग केली. सचिनच्या जवळ मुलांचा गलका जमा झाला. त्यांच्यात भुतांच्या गोष्टी वर गप्पा सुरू झाल्या. भूत अमुक असतं ,तमुक असतं आणि ब-याच गोष्टी चालू होत्या.माझ्या इयत्ता चौथीचा इंग्रजी विषय असल्याने मी पेपर तपासत असताना मुलांमधील सुरु असणा-या गप्पांकडे लक्ष जात होतेच.थोडा वेळ थांबून ऎकून घेतले. गावात म्हसोबाचे मंदीर आहे त्या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जातेय. भूत म्हणले की देव आलाच त्यामुळे म्हसोबावर बोलत होते. म्हसोबावर कडे हातात घातले की भूत काय बी करत नाय. माझी आई म्हसोबाला  दिवा लावते ...