Skip to main content

मुलांना समजून घेताना घाई कशाला?

# *मुलांना समजून घेताना घाई कशाला?*

रविवारचा दिवस होता. माझा Laptop ची बॅटरी प्रोबलेम आणि इतर updated software घेण्यासाठी दुकानात गेलो होतो. माझ्या लॅपीचे काम होईपर्यंत मी खुर्चीत बसलेलो होतो. तिथे आलेल्या काही जणांसोबत शिक्षण ,विद्यार्थी ,शाळा यावर गप्पा सुरु होत्या. त्यातील एक प्रसंग लिहावा वाटला.  एकजण बोलत होते माझ्या वर्गातील काही मुले अजिबात बोलत नाहीत.एकदम शांत बसून घेतात.आपण पन्नास वाक्य बोलावी तेव्हा ते एक वाक्य बोलतात बाकी ढिम्म बघत बसतात. ते विद्यार्थी बोलले नाहीत. त्यांचा स्वभाव कसा कळेल? त्याच्या मनात काय चाललेय, हे कसं कळेल?आणि मला कळल्याशिवाय मी त्यांना काय सांगू?  ते एकदम शांत बसतात म्हणजे ते ढिम्म आहेत ,म्हणजे ते ढ आहे त्यांची बुद्दीची चालत नाही असे त्यांचे मत येत होते.
 खरतर वास्तवात तसे नसतेही. कारण स्वभाव आणि बुद्धिमत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं समजलं जातं . अनेकदा आपण तक्रार करत असतो की अमुक्याचा स्वभाव असा आहे ,त्याला मी काय करणार?  त्याची बुद्धिमत्ता कमी आहे त्याला मी काय करणार.परंतु स्वभाव आणि बुद्धिमत्ता यांना जोडणारी गोष्ट म्हणजे त्याची विचारशैली. आपण जेव्हा एखाद्याचा स्वभाव अमुक आहे तमुक आहे असे म्हणतो त्यावेळी त्याची विचारशैली तशी आहे . मुलांच्यावर काय सर्वांच्या विचार करायच्या पद्धतीवर माणसाचा स्वभाव ठरत असतो आणि त्यातून बुद्धिमत्ता प्रकट होत असते. म्हणून मुलांचा स्वभाव समजला की त्याची विचारशैली समजेल आणि वैचारशैली समजली की आपण कोणत्या प्रसंगात त्यांच्याशि कसे वागता येईल ते समजणे सोपे जाईल. ज्यावेळी आपल्याला मुलांचा स्वभाव, वैचारशैली न समजल्यामुळे वरील प्रकारच्या तक्रारी आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात.
मूल समजून घेणे ही हवी तितकी गोष्ट सोपी नाहीच आहे पण समजून घेण्याचा प्रयत्न करुन त्यादृष्टीने पाऊल उचलत जायला हवे. एखाद्याच्या स्वभावावरुन विचारशैली समजून घेऊयात आणि मग त्याची बुद्धिमत्ता ठरवूयात.
एखाद्याची विचारशैली समजून न घेता त्याच्या बुद्धीमत्तेसंबंधी काढलेला निष्कर्ष घाईचा होईल असे मला वाटते. 
- *ज्ञानदेव नवसरे, नाशिक*

Comments

Popular posts from this blog

लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा ..

*लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा..* www.Shikshanvichar.blogspot.in              अलीकडे  पाल्यांच्या विकासासाठी पालक मेहनत घेताना दिसत आहेत . पालकत्व म्हणून त्यांचे खुप कौतुकच करावे लागेल पण यामध्ये मुलांची गुणवत्ता, आवड निवड, त्याचे वय, क्षमता लक्षात घेऊन प्रयत्न करायला हवेत असे मला वाटते. जिथे मुलगा दोन वर्ष पूर्ण करतोय , नीट बोलायला लागत नाही तिथे आई बाप लेकराला नर्सरी वगैरे वर्गात कोंबतात. मुलांना अभ्यास करायचा ससेमिरा पाठीमागे लागण्याचे वातावरण घरोघरी तयार होताना दिसत आहे आणि ते भयानक आहे . नर्सरी, प्ले ग्रुप वगैरे या वर्गात टाकायला हरकत नाही पण तिथे त्याच गोष्टी व्हाव्यात ज्या घडायला हव्यात.  गाणी, खेळ या गोष्टींसाठी त्यांचा फायदाही होतोच. पण यासोबतच कमी वयाच्या याच लेकरांकडून पालकांच्या अपेक्षा वाढायला सुरु होतात . मुलाने लिहिले पाहिजे, वाचले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यासाठी अभ्यास घ्यायला सुरुवात होते. मुलांनी अभ्यास करावा असे पालकांना वाटू लागते. मुलांचा अभ्यास म्हणजे काय हो?  महागडी पुस्तके, वह्या , वर्कबुक ,सीड...

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

शिक्षण म्हणजे नुसती पोपटपंची नव्हे.

#पालकत्व      ✍🏻 ज्ञानदेव नवसरे आज मेन्स पार्लरच्या दुकानात बसलेलो होतो .त्याठिकाणी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे दोन पालक शेजारीच बसले होते (विशेष म्हणजे ते मराठी शाळेचे शिक्षकच अाहेत) . आज सुट्टी असल्याने त्यांच्या लेकरांना पण घेऊन आले होते. त्यांच्या चर्चा चालु होत्या. आमच्या सोम्याची शाळा अमुक करुन घेतेय ,दुसरा सांगता होता आमच्या गोम्याची शाळा तमूक करून घेतेय. सहज मुलांना प्रश्नही केले जात होते.  पाठांतरावर आ्दारित अअसणाऱ्या प्रश्नांची मुले सहज उत्तरे देत होती. एकमेकांकडून एकमेकांच्या लेकरांना शाबासकी ददेण्याचे काम सुरु होते.  मी शांतपणे सर्व ऎकून घेत होतो. माझ्या मनात विचार आला की मुलांची अशी पोपटपंची म्हणजे शिक्षण असे पालकांना वाटतेय का?  खरोखरच याला शिक्षण म्हणावे का ? खरंतर शिक्षण म्हणजे विकास, शिक्षण मम्गणजे सुसंस्कार , शिक्षण म्हणजे अभिव्यक्ती इतक्या व्यापक अर्थाने असणारा हा शब्द आज केवळ परिक्षा अन परीक्षेचे गुणदान यापुरता मर्यादित राहतोय का?  आणि त्याच दृष्टीने प्रयत्न म्हणजे केवळ परिक्षा तयारी च्या शिक्षण हे मुलांचा विकास त्यांच्या कल...