Skip to main content

उत्साहाचे वातावरण आणि आपण

*#उत्साहाचे वातावरण आणि आपण*

सध्या आजूबाजूला पाहिले तर अनेक मुले, शिक्षक,पालक यांच्यात एक तक्रार नेहमी आढळताना दिसते की 'मला बोअर होतेय , मला कंटाळा आलाय ,मी करणार नाही'.  
या उत्साहाच्या बाबतीत घडलेला मला एक प्रसंग आठवतोय.गेल्या आठवड्यात नवरात्रानिमित्त येवल्यात नऊ दिवस कोटमगावच्या देवीची मोठी यात्रा असते त्या दरम्यान एका दिवशी विद्यार्थी उपस्थिती  ब-यापैकी कमी होती. मुख्याध्यापक सर आणि मी विद्यार्थ्यांच्यासोबत जेवण करत होतो. आमच्या जेवताना गप्पा सुरु असतात.  एका सहावीचा मुलगा म्हणाला,"आज मला लयी बोअर होतेय" .
मी म्हणालो, "बोअर होणे म्हणजे काय?"
"अहो सर, म्हणजे मला करमत नाही,खेळू वाटत नाही,अभ्यास करु वाटत नाही" .

जवळचे  घडवणारे, खेळवणारे आणि मदत करणारे त्याचे  मित्र आज शाळेत आले नव्हते त्यामुळे त्याला तसे वाटत होते. 
खरतर मुलांची उपस्थिती हवी तितकी नसेल तर केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांमधील उत्साह पण मावळतो .डोके चक्रावल्यासारखे होते. मुलांच्यामध्ये उत्साह नसेल तर शिक्षकांमध्ये त्यांना शिकवायला ,त्यांच्याशी बोलायला, त्यांच्याकडून उपक्रमात सहभागी करुन घ्यायला पण उत्साह राहत नाही.  
याउलट ज्या मुलांमध्ये उत्साह दिसतो ती मुले लगेच ओळखू येतात. त्यांच्या डोळ्यात विलक्षण चमक दिसते,चेह-यावर तेज दिसते अगदी कुठेही अशी मुले ओळखायला येतात , अशा मुलांसोबत काम करायला आनंद वाटतो.

अलीकडे विविध कामांच्या ताणाने उत्साह कमी होण्याची भिती दिसतेच आहे.
शिक्षक ,विद्यार्थी किंवा पालक यांच्यातील उत्साह का हरवतोय ? हा महत्त्वाचा प्रश्न समोर येतोय.
 एक तर प्रचंड शारीरिक ताण.
खाजगी शाळेतील लेकरांना तर प्रचंड वेळानंतर स्कूलबसने होणारा प्रवास, पुन्हा शाळा ,शिकवण्या ,त्या शिकवण्याला जायचा प्रवास आणि आणखी इतर गोष्टीत मुले थकून जात आहेत त्यामुळे विद्यार्थी उत्साही दिसत नाहीत.
शिक्षकांमध्येही अतिरिक्त कामाचा बोजा,अशैक्षणिक कामे, गोंधळून सोडणारे शासन निर्णय यामुळे शिक्षकांमधील कामाचा उत्साह मावळत आहे की काय अशी भिती मनात येते.
यामुळे शिक्षक अन विद्यार्थी मानसिकदृष्ट्या अनेकदा उत्साही बनत नाहीत.
प्रत्येकाच्या जीवनात हास्य विनोद आणि खेळ यांचा समावेश असायला हवा. 
मुलांना आणि आपल्याला उत्साही राहयचं असेल तर आपण आनंदी राहायला हवं.
आनंदी असणं खरं तर घरातील वातावरणावर , आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर खुप अवलंबून असते.
खरतर काही कारण नसताना वैतागलेले अनेक  लोकं सध्या दिसतात कारण ते आनंदी राहू शकत नाहीत त्यामुळे उत्साह सुद्धा दाखवू शकत नाहीत.
विनाकारण दुखी राहण्यापेक्षा अापल्या घरात हास्य, थट्टा मस्करी चे वातावरण असेल ,विनोदाचे वातावरण असेल तर आपोआप घरामध्ये उत्साह निर्माण व्हायला मदत होते. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावारण असण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी पालकांसोबतही चर्चा करायला हरकत नाही. लहान वयात मुलांसाठी दिलेला वेळ ही त्याची उत्कृष्ट  पायाभरणी आहे हे पालकांना समजून सांगायला हवे. आपल्या मुलांना उत्साही बनवायचे असेल तर आपल्यातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी बनवायला हवे आहे .

- ज्ञानदेव नवसरे, नाशिक

Comments

Popular posts from this blog

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

जबाबदारी विकासाची

#जबाबदारी_विकासाची व्यक्तीच्या वर्तनात अपेक्षित वर्तनबदल घडवून आणणारी ,सर्वांगीण विकास साधणारी स्वयंस्फूर्त, अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया म्हणजे शिक्षण ...शिक्षण प्रक्रिया कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू असते.  मुलांच्या अध्ययनास मदत करणाऱ्या या संस्थांवर असणारी जबाबदारी सर्वांनी समजून घेणे गरजेचे असते. विद्यार्थी विकासाची संपूर्ण जबाबदारी शाळाचीच आहे असे म्हणणे म्हणजे स्वतः च्या जबाबदारीतून काढता पाय घेणे . कुटुंबाने काढता पाय घेतला तर मुलांच्या अध्ययनाच्या आणि विकासाच्या गतीवर परिणाम घडून येतो. मूल हे समाजाचा एक अविभाज्य घटक आहे .समाजातील सकारात्मक व नकारात्मक वातावरणात वाढत असते. शाळा ,कुटुंब यांनी निरीक्षणातून मुलांच्या विकासाच्यादृष्टीने प्रयत्नास मदत भेटत असते. शाळेतील अनेक गोष्टी मुलं कुटुंब आणि समाजाकडून शिकत असते याउलट समाजातील अनेक गोष्टी शाळा अन कुटुंबासोबत शिकत असते. कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या पातळीवर विद्यार्थी विकासाचा राजमार्ग पालक व शिक्षकांनी लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास मुलांचा सर्वांगीण विकास करणे सोपे जाते असे मला...