Skip to main content

उत्साहाचे वातावरण आणि आपण

*#उत्साहाचे वातावरण आणि आपण*

सध्या आजूबाजूला पाहिले तर अनेक मुले, शिक्षक,पालक यांच्यात एक तक्रार नेहमी आढळताना दिसते की 'मला बोअर होतेय , मला कंटाळा आलाय ,मी करणार नाही'.  
या उत्साहाच्या बाबतीत घडलेला मला एक प्रसंग आठवतोय.गेल्या आठवड्यात नवरात्रानिमित्त येवल्यात नऊ दिवस कोटमगावच्या देवीची मोठी यात्रा असते त्या दरम्यान एका दिवशी विद्यार्थी उपस्थिती  ब-यापैकी कमी होती. मुख्याध्यापक सर आणि मी विद्यार्थ्यांच्यासोबत जेवण करत होतो. आमच्या जेवताना गप्पा सुरु असतात.  एका सहावीचा मुलगा म्हणाला,"आज मला लयी बोअर होतेय" .
मी म्हणालो, "बोअर होणे म्हणजे काय?"
"अहो सर, म्हणजे मला करमत नाही,खेळू वाटत नाही,अभ्यास करु वाटत नाही" .

जवळचे  घडवणारे, खेळवणारे आणि मदत करणारे त्याचे  मित्र आज शाळेत आले नव्हते त्यामुळे त्याला तसे वाटत होते. 
खरतर मुलांची उपस्थिती हवी तितकी नसेल तर केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांमधील उत्साह पण मावळतो .डोके चक्रावल्यासारखे होते. मुलांच्यामध्ये उत्साह नसेल तर शिक्षकांमध्ये त्यांना शिकवायला ,त्यांच्याशी बोलायला, त्यांच्याकडून उपक्रमात सहभागी करुन घ्यायला पण उत्साह राहत नाही.  
याउलट ज्या मुलांमध्ये उत्साह दिसतो ती मुले लगेच ओळखू येतात. त्यांच्या डोळ्यात विलक्षण चमक दिसते,चेह-यावर तेज दिसते अगदी कुठेही अशी मुले ओळखायला येतात , अशा मुलांसोबत काम करायला आनंद वाटतो.

अलीकडे विविध कामांच्या ताणाने उत्साह कमी होण्याची भिती दिसतेच आहे.
शिक्षक ,विद्यार्थी किंवा पालक यांच्यातील उत्साह का हरवतोय ? हा महत्त्वाचा प्रश्न समोर येतोय.
 एक तर प्रचंड शारीरिक ताण.
खाजगी शाळेतील लेकरांना तर प्रचंड वेळानंतर स्कूलबसने होणारा प्रवास, पुन्हा शाळा ,शिकवण्या ,त्या शिकवण्याला जायचा प्रवास आणि आणखी इतर गोष्टीत मुले थकून जात आहेत त्यामुळे विद्यार्थी उत्साही दिसत नाहीत.
शिक्षकांमध्येही अतिरिक्त कामाचा बोजा,अशैक्षणिक कामे, गोंधळून सोडणारे शासन निर्णय यामुळे शिक्षकांमधील कामाचा उत्साह मावळत आहे की काय अशी भिती मनात येते.
यामुळे शिक्षक अन विद्यार्थी मानसिकदृष्ट्या अनेकदा उत्साही बनत नाहीत.
प्रत्येकाच्या जीवनात हास्य विनोद आणि खेळ यांचा समावेश असायला हवा. 
मुलांना आणि आपल्याला उत्साही राहयचं असेल तर आपण आनंदी राहायला हवं.
आनंदी असणं खरं तर घरातील वातावरणावर , आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर खुप अवलंबून असते.
खरतर काही कारण नसताना वैतागलेले अनेक  लोकं सध्या दिसतात कारण ते आनंदी राहू शकत नाहीत त्यामुळे उत्साह सुद्धा दाखवू शकत नाहीत.
विनाकारण दुखी राहण्यापेक्षा अापल्या घरात हास्य, थट्टा मस्करी चे वातावरण असेल ,विनोदाचे वातावरण असेल तर आपोआप घरामध्ये उत्साह निर्माण व्हायला मदत होते. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावारण असण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी पालकांसोबतही चर्चा करायला हरकत नाही. लहान वयात मुलांसाठी दिलेला वेळ ही त्याची उत्कृष्ट  पायाभरणी आहे हे पालकांना समजून सांगायला हवे. आपल्या मुलांना उत्साही बनवायचे असेल तर आपल्यातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी बनवायला हवे आहे .

- ज्ञानदेव नवसरे, नाशिक

Comments

Popular posts from this blog

रंगू आत्मविश्वासाच्या रंगी

*रंगू आत्मविश्वाच्या रंगी*                  - ज्ञानदेव नवसरे                        आत्मविश्वास ही विजयाची चावी आहे . आत्मविश्वास असेल तर विजय पायाशी लोळण घेतो हे विद्यार्थी दशेपासून अनुभवत आलो आहोत. एखादी गोष्ट करताना, बोलताना  आत्मविश्वास खुप महत्त्वाचा असतो. आपल्यात एखाद्या गोष्टीतील आत्मविश्वास विकसित होताना  आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा पगडा असतोय.                    महाराष्ट्रात येवल्याचा पतंगोत्सव प्रसिद्ध आहे.इथे पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गेल्या आठ -पंधरा दिवसांपासून बच्चे कंपनी पतंगोत्सवाची लगबग सुरु होती आणि आज मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. आमच्या शेजारला राहणाऱ्या दिगांबर यादव सरांचा मुलगा दादूची अन शंभूची खुप छान गट्टी आहे. तो शंभुपेक्षा मोठा आहे वय अन अनुभवाने सुद्धा. मुलं घरातील अन बाहेरील अनुकरणातून ब-याच गोष्टी शिकत असतात तसे शंभू देखील दादूकडून अनेक गोष्टी शिकत असतो. पतंग ,रीळ, मांजा...

माझा पाडा ,माझे विद्यार्थी

 *माझा पाडा, माझे लोक, माझे विद्यार्थी*     - ज्ञानदेव नवसरे        पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील सेवा हा आयुष्यभर न विसरता येणारा ठेवा आहे .पेठच्या पश्चिमेस १० किमी अंतरावर गुजरात सरहद्दीवर असणारे डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टुमदार असा कळमपाडा माझ्या सुरूवातीच्या सात वर्षांच्या नोकरीचा न विसरता येणारा महत्त्वाचा टप्पा होता.            कोराना कालावधीमुळे लांबणीवर पडलेली आमची कळमपाडा शाळेचे भेट आज धामणगाव शाळेच्या टीमसोबत  झाली.           कळमपाडा हे निसर्गाने जितके नटलेलं आहे त्यापेक्षा जास्त या पाड्यामध्ये राहणाऱ्या माझ्यासारख्या पर-जिल्ह्यातून आलेल्या लेकरावरं स्वतःच्या लेकराइतकं, भावाइतकं प्रेम करणाऱ्या माझ्या ह्रदयस्पर्शी लोकांचं हे गाव आहे. माझ्याबद्दल कळमपाड्यातील लोकं काय बोलतात हे कळमपाड्यातील लोकं , माझे विद्यार्थी बोलतील ,याबद्दल मी काय बोलणार ?               काम करणा-या शिक्षकांच्या कामाचा सन्मान कसा करावा हे आमच्या कळमप...

मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत

* मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत ....* 📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक* फोटो सौजन्य : Google              आज पहिलीच्या मुलांना मुक्त चित्र काढण्यासाठी कोरे कागद दिले होते. मी फळ्यावर फुले,बादली, ग्लास, फुलपाखरू यांचे सोप्या पद्धतीने काढलेली चित्रे फळ्यावर रेखाटली होती.      सचिन ने काढलेले चित्र मला दाखवले. मी म्हणालो,"हे काय आहे ?" सचिन, "हे भूताचे , हे माझे आणि हे माझ्या घराचे चित्र आहे". मी म्हटले, छान काढलेय. मुलांनी सचिनचे चित्र पाहायला लगबग केली. सचिनच्या जवळ मुलांचा गलका जमा झाला. त्यांच्यात भुतांच्या गोष्टी वर गप्पा सुरू झाल्या. भूत अमुक असतं ,तमुक असतं आणि ब-याच गोष्टी चालू होत्या.माझ्या इयत्ता चौथीचा इंग्रजी विषय असल्याने मी पेपर तपासत असताना मुलांमधील सुरु असणा-या गप्पांकडे लक्ष जात होतेच.थोडा वेळ थांबून ऎकून घेतले. गावात म्हसोबाचे मंदीर आहे त्या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जातेय. भूत म्हणले की देव आलाच त्यामुळे म्हसोबावर बोलत होते. म्हसोबावर कडे हातात घातले की भूत काय बी करत नाय. माझी आई म्हसोबाला  दिवा लावते ...