Skip to main content

आत्मविश्वास हा बुद्धिमत्ता विकसनाचा राजमार्ग

*#आत्मविश्वास हा बुद्धिमत्ता विकसनाचा राजमार्ग*

जून महिन्याचे सुरुवातीचे शाळेचे दिवस होते. इयत्ता पहिलीत नव्याने मुले दाखल होत होते. शाळेचे वातावरण त्यांच्यासाठी अनोळखी होते. काही मुले सभाधीटपणे बोलत तर काही मुले लाजरीबुजरी आणि घाबरलेली असायची. तीन दिवस साईची आई त्याला घेऊन सुरूवातीला बसली तरीही साई शाळेत बसल्यावर रडत असायचा. काही दिवसानं माझ्यावर त्याचा विश्वास बसल्यावर रडायचा थांबला. साईबद्दल नंतर स्वतंत्र निश्चितपणे लिहिणार आहे. यश हा एकांगी राहणारा आणि अतिशय घाबरट होता. मी वर्गाच्या बाहेर गेलो की बँंचखाली लपून बसायचा. मी विचारायचो,  "यश कुठे गेला?" मुले सांगायची, "बँंचखाली लपलाय" .
मी जवळ जाऊन त्याला बोलावण्याचा प्रयत्न केला तर रडायचा म्हणून मी त्याला जास्त बळजबरी कधीही केली नाही. तो तसाच बँचखाली लपून बसायचा.  चाॅकलेट आणल्यात ,मोबाईलवर कार्टुनस् लावल्यात म्हटल्यावर हळूच वर बसायचा तरी माझ्या जवळ यायचा नाही. एके दिवशी दोनच मुले पहिलीची आली होती. दोघंजण एका रॅम्पवर घसरगुंडी करत होते.मी दोघांच्या जवळ गेलो .मोबाईलवर कार्टुनस् लावल्या. शाळेचे सुरुवातीचे चार पाच दिवस उलटले असतील. यश माझ्या जवळ आला आणि म्हणाला ,":तुमच्या मोबाईलात गेम आहे का?"
 "कोणती रं गेम?" मी उत्तरलो.
"त्या गेमी असत्यात ना मोबाईलवर खेळायला "
"हो आहेत की"
अशा ब-याच गप्पा झाल्या .माझा मोबाईलवर  यशने ताबा मिळवला होता.बराच वेळ माझा मोबाईल घेऊन कार्टुन पाहत होता. हळूहळू यो जवळ येत होता. माझ्याच नाही आमच्या इतर मुलांसोबतही तसाच वागत असायचा. 
माझ्या मनात भिती होती की हा असाच घाबरट राहिला तर त्याचा आत्मविश्वास वाढवायचा कसा?  आणि आत्मविश्वास वाढवला नाही तर क्षमता कशा वाढवायच्या पण काही दिवसांत मला त्याच्यातील इतरांबद्दलची भिती दूर करता आली. इतका घाबरट का आहे म्हणून त्याच्या घरी एकदा गेलो होतो. त्यावेळी समजले की त्याचे वडील त्याला अधूनमधून मारत असतात. त्या भितीनेच तो घाबरट झाला असावा तसेच इतर मुलांसोबत त्याचे अनुभवही काहीसे वेगळे असू शकतात.
एक मात्र खरय की मुलांमध्ये इतरांबद्दलचा विश्वास आणि स्वतःबद्दलचा आत्मविश्वास नसला की ती मुले घाबरतात. ज्या मुलांकडे आत्मविश्वास असतो त्यांच्या बुद्धीला लवकर चालना मिळते याउलट जी मुले घाबरट असतात ती मुले मागेच राहणे पसंत करतात.यशच्या सुरुवातीला घरगुती आणि परिचयाचे काही प्रश्न विचारले तरी तो उत्तरे द्यायचा नाही. त्याच्यात आत्मविश्वास कमी होता त्यामुळे बुद्दीचा वापर करायलाही त्याला भिती वाटत असावी. मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या चांगल्या वागणुकीमुळे त्याच्यात बदल झालाय .
आज मला हक्काने प्रश्न विचारतोय, मुलांसोबत आवडीने खेळतोय.
वाचन करताना आवडीने सहभाग घेतो.माझ्याजवळ स्वतः च्या अपेक्षा व्यक्त करतोय. कारण त्याचा आत्मविश्वास वाढलाय त्यामुळे त्याची बुद्धिमत्ता विकसनासाठी प्रयत्न करणे सोपे जात आहे. 
     वेळीच लक्ष दिले नाही तर यशसारखी मुले बुजरी निघतात  आणि या बुजरेपणामुळे बुद्दीचा वापर केला जात नाही. आपण म्हणत असतो की जी वस्तू वापरली नाही तिचा विकास कमी होत असतो. यासाठी मुलांचा आत्मविश्वास कसा वाढेल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. घरातील वागणुकीचा मुलांच्या मनावर काही परिणाम होत असेल तर घरी जाऊन पालकांना कल्पना द्यायला हवी.मुलगा अमुक प्रकारे का वागतोय याचे विश्लेषण करुन पालकांना समजावून सांगता आले पाहिजे. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वासाची कमी किंवा वाढ ही त्याला दिलेल्या वागणूकीतून ,विचारांतून घडत असते. त्यामुळे पालक आणि शिक्षक यांच्यातील समन्वयाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी खुप मदत होते.
आज यश मला हक्काने बोलतोय, विद्यार्थ्यांमध्ये मिसळतोय , आत्माविश्वासाने वाचतोय. 
- *ज्ञानदेव नवसरे ,नाशिक*

Comments

Popular posts from this blog

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

जबाबदारी विकासाची

#जबाबदारी_विकासाची व्यक्तीच्या वर्तनात अपेक्षित वर्तनबदल घडवून आणणारी ,सर्वांगीण विकास साधणारी स्वयंस्फूर्त, अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया म्हणजे शिक्षण ...शिक्षण प्रक्रिया कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू असते.  मुलांच्या अध्ययनास मदत करणाऱ्या या संस्थांवर असणारी जबाबदारी सर्वांनी समजून घेणे गरजेचे असते. विद्यार्थी विकासाची संपूर्ण जबाबदारी शाळाचीच आहे असे म्हणणे म्हणजे स्वतः च्या जबाबदारीतून काढता पाय घेणे . कुटुंबाने काढता पाय घेतला तर मुलांच्या अध्ययनाच्या आणि विकासाच्या गतीवर परिणाम घडून येतो. मूल हे समाजाचा एक अविभाज्य घटक आहे .समाजातील सकारात्मक व नकारात्मक वातावरणात वाढत असते. शाळा ,कुटुंब यांनी निरीक्षणातून मुलांच्या विकासाच्यादृष्टीने प्रयत्नास मदत भेटत असते. शाळेतील अनेक गोष्टी मुलं कुटुंब आणि समाजाकडून शिकत असते याउलट समाजातील अनेक गोष्टी शाळा अन कुटुंबासोबत शिकत असते. कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या पातळीवर विद्यार्थी विकासाचा राजमार्ग पालक व शिक्षकांनी लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास मुलांचा सर्वांगीण विकास करणे सोपे जाते असे मला...

अनुभवलेली लोकं

*मी अनुभवलेली लोकं* 📝 *ज्ञानदेव नवसरे* #Status ला *@बालसेवा देशविकासासाठी* लिहितात आणि *बालकांसाठी झटणा-यांचा व्देष* करतात. ही उलटदर्शी लोकं घातकच. # Status ला *@नाते_ऋणानुबंधाचे* लिहितात आणि *मैत्री करताना जात पाहतात* ही उलटदर्शी लोकं घातकच. #Statusला *समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानतात* आणि जो *समाजासाठी झगडतोय त्यांचा व्देष* करतात. ही उलटदर्शी लोकं घातकच. अशी *उलटदर्शी लोकं सुलटं काम करणारांनाच त्रास* देतात. #तात्पर्य  *माणसं जोडताना जात ,नातेसंबंध,फुकटची देशभक्ती नाही तर त्याचे इतरांसोबतचे नाते, त्याचे समाजासाठीचे काम आणि देशासाठीचे काम पहावे.* # *तुम्ही देशभक्त आहात  तुम्हाला कुणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही.* धन्यवाद🙏🏻