*रंगू आत्मविश्वाच्या रंगी* - ज्ञानदेव नवसरे आत्मविश्वास ही विजयाची चावी आहे . आत्मविश्वास असेल तर विजय पायाशी लोळण घेतो हे विद्यार्थी दशेपासून अनुभवत आलो आहोत. एखादी गोष्ट करताना, बोलताना आत्मविश्वास खुप महत्त्वाचा असतो. आपल्यात एखाद्या गोष्टीतील आत्मविश्वास विकसित होताना आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा पगडा असतोय. महाराष्ट्रात येवल्याचा पतंगोत्सव प्रसिद्ध आहे.इथे पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गेल्या आठ -पंधरा दिवसांपासून बच्चे कंपनी पतंगोत्सवाची लगबग सुरु होती आणि आज मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. आमच्या शेजारला राहणाऱ्या दिगांबर यादव सरांचा मुलगा दादूची अन शंभूची खुप छान गट्टी आहे. तो शंभुपेक्षा मोठा आहे वय अन अनुभवाने सुद्धा. मुलं घरातील अन बाहेरील अनुकरणातून ब-याच गोष्टी शिकत असतात तसे शंभू देखील दादूकडून अनेक गोष्टी शिकत असतो. पतंग ,रीळ, मांजा, पतंगाची भरारी , उंचीची चढाओढ, पतंग काटणे ,पतंगोत्सव करताना गीत अशा अनेक बाबी शंभूच्या बाबतीत पहिल्यांदाच घडत होत्या. आठ -दहा दिवसांपासून त्याच्या पतंगाच्या बाबी स
शिक्षण विचार .... एक शैक्षणिक अनुभव