Skip to main content

रंगू आत्मविश्वासाच्या रंगी

*रंगू आत्मविश्वाच्या रंगी*
                 - ज्ञानदेव नवसरे
           
           आत्मविश्वास ही विजयाची चावी आहे . आत्मविश्वास असेल तर विजय पायाशी लोळण घेतो हे विद्यार्थी दशेपासून अनुभवत आलो आहोत. एखादी गोष्ट करताना, बोलताना  आत्मविश्वास खुप महत्त्वाचा असतो. आपल्यात एखाद्या गोष्टीतील आत्मविश्वास विकसित होताना  आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा पगडा असतोय.
                   महाराष्ट्रात येवल्याचा पतंगोत्सव प्रसिद्ध आहे.इथे पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गेल्या आठ -पंधरा दिवसांपासून बच्चे कंपनी पतंगोत्सवाची लगबग सुरु होती आणि आज मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. आमच्या शेजारला राहणाऱ्या दिगांबर यादव सरांचा मुलगा दादूची अन शंभूची खुप छान गट्टी आहे. तो शंभुपेक्षा मोठा आहे वय अन अनुभवाने सुद्धा. मुलं घरातील अन बाहेरील अनुकरणातून ब-याच गोष्टी शिकत असतात तसे शंभू देखील दादूकडून अनेक गोष्टी शिकत असतो.
पतंग ,रीळ, मांजा, पतंगाची भरारी , उंचीची चढाओढ, पतंग काटणे ,पतंगोत्सव करताना गीत अशा अनेक बाबी शंभूच्या बाबतीत पहिल्यांदाच घडत होत्या. आठ -दहा दिवसांपासून त्याच्या पतंगाच्या बाबी सुरु होत्याच.  पतंगोत्सवाचा खरा दिवस म्हणजे संक्रात .संक्रातीला शाळेला सुट्टी म्हणून दिगांबर यादव सर सहपरिवार पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत.
          आज दादूच्या येवल्यातल्या अनुपस्थितीने पतंगाची भरारी शंभूला दिसत नाहीये. सकाळी गॅलरीत उभा शंभू आकाशातील पतंगाची रंगबेरंगी पंगत पाहून आल्यावर माझ्याजवळ पतंगाच्या गप्पांचा रट्टा सुरु केला.
            आठेक दिवसांपूर्वी त्याने मला पतंग मागितली होती पण पतंगोत्सवाला वेळ होता त्यामुळे मी त्याची समजूत काढली होती.
आज वेळ आली होती पतंगोत्सवाची .गावातून पतंग आणली . पतंगाला मंगळसूत्र बांधले. खरंतर लहान पणी पतंगाचा खुप अनुभव घेतलेला आहे पण मंगळसूत्र बांधताना माझ्याकडून गफलत झालीच . त्याच्यातील मापांचे गणित हुकले होते.
             पतंग आणि दोरा घेऊन शंभू अन मी छतावर गेलो.
शंभू आत्मविश्वासाने बोलत होता. त्याला खुप आनंद झाला होता ."आप्पा माझ्याकडे द्या, मी पतंग उडवणार आहे .मला पतंग करता येते." हातांच्या पतंग उडविण्याच्या कृती करत दोरा खेचायचा कसा ते सांगत होता. पतंग कशी हवेत उडवायची ते सांगत होता.दोरा अन मांजातील फरक सांगत होता.पतंग उडविताना काय काय करायचे?  सगळ्या कहाण्या शंभूच्या तोंडातून अापसूकच येत होत्या.
पतंगाबद्दल तुला कसंकाय माहिती म्हटल्यावर मला सगळं माहिती आहे हे त्याचे उत्तर. पतंगाचे मंगळसूत्र चुकले होते अन वाराही कमीच त्यामुळे पतंग झेप घ्यायला तयार होत नव्हता.
"अहो आप्पा माझ्याकडे द्या ना. मी पतंग उडवितो", त्याचे रहाटगाणे सुरूच होते. दोरा अन पतंग शंभूच्या जवळ देऊन टाकली.  पतंग उडवितानाचा भरपूर कसरत सुरु होती. परंतु पतंग हवेत झेप घेत नव्हताच . त्याचे प्रयत्न सुरूच होते. तोपर्यंत शेजारच्या अरूणला बोलावून दुस-या पतंगाला बरोबर मंगळसूत्र बनवून घेतले. आता वा-याचा वेग काहीसा वाढला होता.शंभूच्या हातात नवीन पतंग दिली आणि अरुणच्या मदतीने  पतंग उडविलीही.  मला तर खुप कौतुक लागले. पतंग हवेत उडतेय. ती माझी पतंग आहे याचा आनंद शंभूचे अनुभवविश्व वाढवित होता.
खरंतर तर आम्ही पतंग घेऊन जात असतानाचा त्याचा आत्मविश्वास दिसत होता. त्याच्या आजूबाजूला घडणा-या घटना आणि कृती यांच्यातून आला होता.
            आत्मविश्वास आपल्याला जीवन जगायला शिकवितो हा त्यातीलच एक प्रकार.म्हणूनच म्हणतात ना, आत्मविश्वास ही एक शक्ती आहे ती पर्वतालाही हलवू शकते.

धन्यवाद 🙏🏻

Comments

  1. Supper series of taking an account of diversions in human mind

    ReplyDelete
  2. खुप छान शब्दांचा वापर करून मांडायला सुरुवात केली....शेवटही अगदी योग्य वेळी केला

    ReplyDelete
  3. खूप छान लेखन !💐

    ReplyDelete
  4. खूपच छान मांडणी 👏👏👌👌👌

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. माऊली....
    काही साध्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्याच गोष्टी आपण मुलांकडून शिकतो. शंभूचे निश्चिंत कौतुक वाटलं.
    शब्दांकन छानच....



    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी विकास

#विद्यार्थी विकास आमच्या पहिलीच्या वर्गातील कृष्णा नावाचा मुलगा शब्द चित्रांचा खेळ खेळताना नेहमीच त्याच्या भावविश्वात रमत असतो. एखाद्या वस्तूचे चित्र दाखविले तर त्यांचे त्या चित्रासंबंधी घरचे आणि त्याला अनुभवाला आलेले विचार सुरु असतात. आणि तो तसं सांगूनही टाकतो. एकदा फळ्यावर आम्ही साप हा शब्द तयार करुन वाचला कृष्णाने त्याच्या घरी निघालेल्या सापाचा सर्व अनुभव सांगितला. मी त्याला कुठेही अडवले नाही. उलट आणखी प्रश्न विचारून त्याला बोलते केले. त्याचे ज्ञान पाहून मला आश्चर्य वाटले. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये खुप ज्ञान असतं पण ते  त्यांना ते मांडता आलं नाही तर त्यामुळे निराशा यायला लागते. बरेचदा असं होतं. ज्यांना ज्ञानासोबत मांडण्याची कला असते ती मुलं जास्त आत्मविश्वासी दिसतात. कृष्णा खुप आत्मविश्वासाने बोलत होता. अनेकदा मुले वेगळ्या पद्धतीने विचार मांडत असतात. एखाद्या विषयाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करताना दिसतात.अशा मुलांना कधीही थांबवू नये. नवीन विचार करणं, नवीन दिशा मिळणं हा खरतर चांगला गुण आहे. घरीही मुलं बोलत असतात.पण बरेचदा पालक -शिक्षकच मुलांना थांबवत असतात. मुलांसोबत मनाने रा

माझा पाडा ,माझे विद्यार्थी

 *माझा पाडा, माझे लोक, माझे विद्यार्थी*     - ज्ञानदेव नवसरे        पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील सेवा हा आयुष्यभर न विसरता येणारा ठेवा आहे .पेठच्या पश्चिमेस १० किमी अंतरावर गुजरात सरहद्दीवर असणारे डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टुमदार असा कळमपाडा माझ्या सुरूवातीच्या सात वर्षांच्या नोकरीचा न विसरता येणारा महत्त्वाचा टप्पा होता.            कोराना कालावधीमुळे लांबणीवर पडलेली आमची कळमपाडा शाळेचे भेट आज धामणगाव शाळेच्या टीमसोबत  झाली.           कळमपाडा हे निसर्गाने जितके नटलेलं आहे त्यापेक्षा जास्त या पाड्यामध्ये राहणाऱ्या माझ्यासारख्या पर-जिल्ह्यातून आलेल्या लेकरावरं स्वतःच्या लेकराइतकं, भावाइतकं प्रेम करणाऱ्या माझ्या ह्रदयस्पर्शी लोकांचं हे गाव आहे. माझ्याबद्दल कळमपाड्यातील लोकं काय बोलतात हे कळमपाड्यातील लोकं , माझे विद्यार्थी बोलतील ,याबद्दल मी काय बोलणार ?               काम करणा-या शिक्षकांच्या कामाचा सन्मान कसा करावा हे आमच्या कळमपाड्यातील लोकांकडून शिकावं .        ब-याच दिवसानंतर आमचा गुरुजी दिसल्यावर डोळ्यात पाणी आणून माझे पाय पकडू पाहणाऱ्या आमच्या भोये आजी , म

शिक्षण प्रेरणादूत

 #प्रेरणादूत :- आशाबाई विजय जेजूरकर             - जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव                 सालाबादप्रमाणे या वर्षीही जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव येथे राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला आयोजित मी ज्ञानी होणार हा सामान्यज्ञानावर आधारित उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या उपक्रमामध्ये आमच्या शाळेतील एक शिक्षक दररोज फळ्यावर संस्थेमार्फत दिले जाणारे पाच प्रश्न लिहित असतो , शाळेच्या आवारात हा फळा मुलांना प्रश्न वहीत उतरून काढण्यासाठी ठेवला जात असतो.मुले वहीत लिहितात, दरमहिन्याला एक सराव चाचणी  परिक्षा घेतली हा नित्यक्रमे वर्षभर चालणारा आमचा कार्यक्रम.           शाळेतील ही प्रकिया घडत असताना याचा परिणाम शाळेतील आजूबाजूच्या घटकांवरही कसा होतो याचे हे उदाहरण आहे. आमच्या शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी असणाऱ्या शा.पो.आ चे काम पाहणाऱ्या आशाबाई विजय जेजूरकर  . सर्व विद्यार्थी , आम्ही शिक्षक त्यांना मामी म्हणतो. त्या  शाळेच्या आवारात ठेवलेल्या फळ्याचे वाचन नियमित करत असतात. दररोज लिहिलेले प्रश्न जाणून घेण्याची  मामींना जणू जिज्ञासाच  असते . आमच्यासोबत अधूनमधून विविध प्रश्नांची चर्चा करत अ