Skip to main content

सहनशक्तीचा डाव

😡😥🤩 *सहनशक्तीचा डाव* 🤩😥😡
                     🖋 *ज्ञानदेव नवसरे*   
        www.Shikshanvichar.blogspot.in

          मुलांना खेळायला आवडते .खेळताना जिंकायला आवडते. मुले खेळात जिंकण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. जीव ओतून खेळतात पण इतके करुनही हार मिळाली की कासावीस होतात.एकमेकांवर राग करायला सुरुवात करतात.
            अध्यक्ष चषकाच्या स्पर्धांच्या तयारीसाठी शाळेत इयत्ता सहावी- सातवी कबड्डीचा सराव आमचे पदवीधर शिक्षक रामेश्वर जाधव सर घेत असायचे. एका शनिवारी त्यांना कामामुळे शाळेवर उपस्थित राहता आले नाही.
          अध्यक्ष चषक स्पर्धा जवळ येतेय, मुलांचा चांगला सराव व्हावा  यासाठी खेळाडूंना मैदानावर घेऊन जावे लागले.मुलांनी त्यांच्या पद्धतीने दोन गटात विभागणी करुन घेतली. एक गट दुस-यापेक्षा जास्तच सरस झाला होता.सातवीचा सचिन जेजुरकर त्यांचे नेतृत्व करत होता. पाच पाच मिनिटाचे दोन सामने झाले पण सचिनच्या गटानेच विजश्री खेचून आणली. माझ्या लक्षात आले की दोन्हीकडं सारख्याच ताकदीचे तुल्यबल खेळाडू असायला हवेत म्हणून थोडा बदल करत सचिनच्या गटातील दोघांची अदलाबदली केली. आता सामन्यात आणखी रंगत येऊ लागली. दोन्हीबाजूंनी सामना जिंकायची रस्सीखेच सुरु झाली. प्रत्येकजण स्वतः चा संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करु लागला. आम्हीच जिंकू असा विश्वास सचिनला वाटायचा कारण तो स्वतः पण चांगला खेळ करतो. यावेळी मात्र सचिनच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा मीच जिंकेल या विश्वासाने नव्याने दुसरा सामना खेळायला सुरुवात झाली पण पुन्हा पराभव झाला.
दोन वेळा पराभव स्वीकारलेल्या सचिनचे लक्ष सोबतच्या खेळांडूवर गेले. त्याने पराभव झाल्यानंतर  इतरांवर चिडायला सुरुवात केली. सहकारी खेळाडूंच्या खेळाचा त्याला राग येऊ लागला. नीट खेळा म्हणून ओरडायला लागला.सहकारी खेळाडूंना भलतंसलतं बोलायला सुरुवात केली. दोन्ही संघ प्रत्येकी दोन डाव जिंकला होता.
           नवीन डाव सुरु करण्याअगोदर सर्वांना जवळ घेतले अन समाजवून सांगितले. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा खेळातही हार अन जीत असतेच. आज दुसरा जिंकला तर उद्या तुम्ही जिंकत असता . खेळावरील लक्ष, सराव, जिंकण्याची जिद्द, समूहकृतीतून तुम्ही जिंकता आणि आनंद साजरा करतात. खेळातील आनंद जसा आवडतो तसा पराभव झाल्यावर समूहभावनेतून त्या सहन करायला सुद्धा आवडायला हवे,  शिकायला हवे. यश मिळाले तर माझ्यामुळे अन पराभव झाला तर सहका-यांकडे पाहण्याची सवय आपल्याला निराशाकडे घेऊन जाते. आपल्या संघाची हार झाली तर आणखी जिद्द,चिकाटी अन एकसंघ खेळून पुन्हा विजश्री आणता येईल कारण हार के आगे जीत है | यातूनच तुमची सहनशक्ती विकसित होणार आहे .
            सहनशक्ती विकसित झाली की भविष्यातील अडचणींना सामोरे जाताना अडचण येत नाही. आपण अडचण सोडविण्यात यशस्वी नाही झालो तर त्यासाठी सहनशक्ती वाढवू शकतो त्यामुळे भविष्यात नैराश्य येत नाही.
            ज्यावेळी मुले हसत हसत हार पचवायला लागतात त्यावेळी त्यांच्यातील खिलाडूवृत्ती अाणखी विकसित होत असते ,ही एक चांगली सवय आहे. स्वतः ची दुबळी सहनशक्ती संपल्यामुळे जगभरातील अनेक लोकं जीवनातील समस्यांना ,दुखांना , अडचणींचा सामोरे जाताना स्वतः ची जीवन यात्रा संपवत आहेत . खरंतर अशा खेळाच्या प्रसंगातून मुलांना भविष्यातील अनेक बाबींबद्दल सजग करता येत असते. विद्यार्थ्यांना अनुभव देताना स्वतःलाही समृद्ध बनवता येते.

धन्यवाद ...

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थी विकास

#विद्यार्थी विकास आमच्या पहिलीच्या वर्गातील कृष्णा नावाचा मुलगा शब्द चित्रांचा खेळ खेळताना नेहमीच त्याच्या भावविश्वात रमत असतो. एखाद्या वस्तूचे चित्र दाखविले तर त्यांचे त्या चित्रासंबंधी घरचे आणि त्याला अनुभवाला आलेले विचार सुरु असतात. आणि तो तसं सांगूनही टाकतो. एकदा फळ्यावर आम्ही साप हा शब्द तयार करुन वाचला कृष्णाने त्याच्या घरी निघालेल्या सापाचा सर्व अनुभव सांगितला. मी त्याला कुठेही अडवले नाही. उलट आणखी प्रश्न विचारून त्याला बोलते केले. त्याचे ज्ञान पाहून मला आश्चर्य वाटले. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये खुप ज्ञान असतं पण ते  त्यांना ते मांडता आलं नाही तर त्यामुळे निराशा यायला लागते. बरेचदा असं होतं. ज्यांना ज्ञानासोबत मांडण्याची कला असते ती मुलं जास्त आत्मविश्वासी दिसतात. कृष्णा खुप आत्मविश्वासाने बोलत होता. अनेकदा मुले वेगळ्या पद्धतीने विचार मांडत असतात. एखाद्या विषयाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करताना दिसतात.अशा मुलांना कधीही थांबवू नये. नवीन विचार करणं, नवीन दिशा मिळणं हा खरतर चांगला गुण आहे. घरीही मुलं बोलत असतात.पण बरेचदा पालक -शिक्षकच मुलांना थांबवत असतात. मुलांसोबत मनाने रा

माझा पाडा ,माझे विद्यार्थी

 *माझा पाडा, माझे लोक, माझे विद्यार्थी*     - ज्ञानदेव नवसरे        पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील सेवा हा आयुष्यभर न विसरता येणारा ठेवा आहे .पेठच्या पश्चिमेस १० किमी अंतरावर गुजरात सरहद्दीवर असणारे डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टुमदार असा कळमपाडा माझ्या सुरूवातीच्या सात वर्षांच्या नोकरीचा न विसरता येणारा महत्त्वाचा टप्पा होता.            कोराना कालावधीमुळे लांबणीवर पडलेली आमची कळमपाडा शाळेचे भेट आज धामणगाव शाळेच्या टीमसोबत  झाली.           कळमपाडा हे निसर्गाने जितके नटलेलं आहे त्यापेक्षा जास्त या पाड्यामध्ये राहणाऱ्या माझ्यासारख्या पर-जिल्ह्यातून आलेल्या लेकरावरं स्वतःच्या लेकराइतकं, भावाइतकं प्रेम करणाऱ्या माझ्या ह्रदयस्पर्शी लोकांचं हे गाव आहे. माझ्याबद्दल कळमपाड्यातील लोकं काय बोलतात हे कळमपाड्यातील लोकं , माझे विद्यार्थी बोलतील ,याबद्दल मी काय बोलणार ?               काम करणा-या शिक्षकांच्या कामाचा सन्मान कसा करावा हे आमच्या कळमपाड्यातील लोकांकडून शिकावं .        ब-याच दिवसानंतर आमचा गुरुजी दिसल्यावर डोळ्यात पाणी आणून माझे पाय पकडू पाहणाऱ्या आमच्या भोये आजी , म

शिक्षण प्रेरणादूत

 #प्रेरणादूत :- आशाबाई विजय जेजूरकर             - जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव                 सालाबादप्रमाणे या वर्षीही जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव येथे राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला आयोजित मी ज्ञानी होणार हा सामान्यज्ञानावर आधारित उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या उपक्रमामध्ये आमच्या शाळेतील एक शिक्षक दररोज फळ्यावर संस्थेमार्फत दिले जाणारे पाच प्रश्न लिहित असतो , शाळेच्या आवारात हा फळा मुलांना प्रश्न वहीत उतरून काढण्यासाठी ठेवला जात असतो.मुले वहीत लिहितात, दरमहिन्याला एक सराव चाचणी  परिक्षा घेतली हा नित्यक्रमे वर्षभर चालणारा आमचा कार्यक्रम.           शाळेतील ही प्रकिया घडत असताना याचा परिणाम शाळेतील आजूबाजूच्या घटकांवरही कसा होतो याचे हे उदाहरण आहे. आमच्या शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी असणाऱ्या शा.पो.आ चे काम पाहणाऱ्या आशाबाई विजय जेजूरकर  . सर्व विद्यार्थी , आम्ही शिक्षक त्यांना मामी म्हणतो. त्या  शाळेच्या आवारात ठेवलेल्या फळ्याचे वाचन नियमित करत असतात. दररोज लिहिलेले प्रश्न जाणून घेण्याची  मामींना जणू जिज्ञासाच  असते . आमच्यासोबत अधूनमधून विविध प्रश्नांची चर्चा करत अ