Skip to main content

मुलांना दिशा देऊयात


*मुलांना दिशा देऊयात* 
अाज नेहमीप्रमाणे शंभू खिदळून आला होता पण त्याच्या चेह-यावरील तेज कमालीचे होते. "आप्पा चला ना खेळायला जावू" शंभू लाडात येऊन बोलला. मी शाळेतून दमून आलो होतो.  "नको रे शंभू ,मी खुप दमलोय.
" आई सांग ना आप्पाला ." खरतर आमचं दोघांचं खेळणं म्हणजे भारीच असतयं. 
शंभूच्या खेळण्यांसोबत रमताना मलाही लहानपणाचा अनुभव घेता येत असतो.कधीकधी माझी बायको मला खुप हसते माझे बाळासोबत असतानाचे संवाद, चेह-यावरील हावभाव पाहून.😁
माझं लहान झालेलं पाहून शंंभू मात्र बिनधास्तपणे माझ्यासोबत खेळतो.
ब्लाॅक्स ची भरणी आम्ही खाली घेतली .दोघंही वेगवेगळे आकार बनवायला लागलो. मी गाडीचा आकार बनविला अन शंभूचे काम सुरूच होते. "काय बनवितोय शंभू?" मी म्हणालो. 
"मला घर बनवायचेय."  मी घराच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले अन त्यानेही सगळी उत्तरे दिली. "मला लय काही बी बनविता येते." शंभू बोलत होता. 
काय काय बनविता येते? बंदूक, गाडी,घर,शाळा ,पाटी ,माणूस. 
मी त्याचे कौतुक केले अन त्याला कवेत घेतले .यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांकडे गुण असतात ,शक्ती असते पण त्यांना वाव दिला जात नाही. अशा शंभूच्या अनेक गोष्टी असतील की ज्यांना मला अजून समजायच्या आहेत ,त्यासाठी त्याला वेळ द्यावा लागणार आहे आणि वेळ पाळून राहावीच लागणार आहे कारण मुलांच्या वाढत्या वयासोबत अन बदलत्या आवडीनिवडीसोबत मला जुळवून घ्यावे लागणार आहे.
   *मुलांकडे शक्ती असते पण ती वापरली जात नाही त्या शक्तीला दिशा दिली जात नाही पण दिशा देणं अत्यंत आवश्यक आहे.* मुलांची ही शक्ती कोणती अन कोणकोणत्या प्रकारच्या आहेत त्या शोधता यायला हव्यात. मग त्यावर काम करता येते.
अनेक मुले हायपर असतात ते शांत बसत नाहीत अशा वेळेस आपण त्यांना एक धपाटा मारून शांत करण्याचा प्रयत्न करतो किंवा घराच्या बाहेर घेऊनच जायचे नाही. लहान वयातील बांधलेले गायीचे वासरू एकदा का सोडले की त्याला समजत नाही कुठे धावायचे ,कसे धावायचे ते नुसतं पळत सुटते, उड्या मारते आपण जर घट्ट पकडले नाही तर आपल्याला पण घेऊन जाते त्यामुळे आपण त्याचा दोर सोडून देणं पसंत करतो. 
मुलांची शक्ती समजण्यासाठी मुलांना अगोदर समजून घेणं आवश्यक आहे म्हणून विद्यार्थ्यांना एखादी घटना ,गोष्ट, आशय शिकवायचा असेल तर अगोदर आपण विद्यार्थी व्हायला हवे. त्यामुळे मुलांच्या आवडीनिवडी ,भावना आणि त्यांचा हेतू आपल्या लक्षात येतो.
कोणती गोष्ट केल्यावर मुलांना आनंद होतो? काय केले ते मुलांना राग येतो?  कशामुळे मुले नाराज होतायेत?  का नाराज होतात?  त्यांना काय करावे वाटतेय ? त्यासाठी मुलांच्या दुनियेत आपण प्रवेश करायला हवा. हे पालक ,शिक्षक यांच्या लक्षात आले की मुलांसोबत बोलायला, अनुभव तयार करायला अन त्यांच्याशी जुळवून घ्यायला खुप सोपे जाते नंतर मुलांच्या आवडीनिवडी ,भावनांचा विचार करुन प्रसंग तयार करता येतात. त्यासाठी मुलांना वेळ दिला पाहिजे.
जसे मुलांना समजून घेण्यासाठी मूल बनावे लागते तसे मुलांना वेळ द्यायचा असेल तर मुलांच्या दुनियेत आपल्याला जावे लागते. त्यावेळेस ख-या अर्थाने मुलांच्या विकासाच्या पाऊलवाटेत आपण सोबत असतोय.
https://shikshanvichar.blogspot.com/2019/01/blog-post.html?m=1
धन्यवाद 🙏🏻

Comments

  1. खुप छान सर आपली निरीक्षण शक्ती वाखाणण्याजोगी आहे

    ReplyDelete
  2. सुंदर विचार

    ReplyDelete
  3. मी आपल्या मताशी सहमत आहे

    ReplyDelete
  4. सर आपण बालकाला ओळखण्यात तरबेज आहात फारच बारकाईने निरिक्षण करता

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा ..

*लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा..* www.Shikshanvichar.blogspot.in              अलीकडे  पाल्यांच्या विकासासाठी पालक मेहनत घेताना दिसत आहेत . पालकत्व म्हणून त्यांचे खुप कौतुकच करावे लागेल पण यामध्ये मुलांची गुणवत्ता, आवड निवड, त्याचे वय, क्षमता लक्षात घेऊन प्रयत्न करायला हवेत असे मला वाटते. जिथे मुलगा दोन वर्ष पूर्ण करतोय , नीट बोलायला लागत नाही तिथे आई बाप लेकराला नर्सरी वगैरे वर्गात कोंबतात. मुलांना अभ्यास करायचा ससेमिरा पाठीमागे लागण्याचे वातावरण घरोघरी तयार होताना दिसत आहे आणि ते भयानक आहे . नर्सरी, प्ले ग्रुप वगैरे या वर्गात टाकायला हरकत नाही पण तिथे त्याच गोष्टी व्हाव्यात ज्या घडायला हव्यात.  गाणी, खेळ या गोष्टींसाठी त्यांचा फायदाही होतोच. पण यासोबतच कमी वयाच्या याच लेकरांकडून पालकांच्या अपेक्षा वाढायला सुरु होतात . मुलाने लिहिले पाहिजे, वाचले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यासाठी अभ्यास घ्यायला सुरुवात होते. मुलांनी अभ्यास करावा असे पालकांना वाटू लागते. मुलांचा अभ्यास म्हणजे काय हो?  महागडी पुस्तके, वह्या , वर्कबुक ,सीड...

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

शिक्षण म्हणजे नुसती पोपटपंची नव्हे.

#पालकत्व      ✍🏻 ज्ञानदेव नवसरे आज मेन्स पार्लरच्या दुकानात बसलेलो होतो .त्याठिकाणी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे दोन पालक शेजारीच बसले होते (विशेष म्हणजे ते मराठी शाळेचे शिक्षकच अाहेत) . आज सुट्टी असल्याने त्यांच्या लेकरांना पण घेऊन आले होते. त्यांच्या चर्चा चालु होत्या. आमच्या सोम्याची शाळा अमुक करुन घेतेय ,दुसरा सांगता होता आमच्या गोम्याची शाळा तमूक करून घेतेय. सहज मुलांना प्रश्नही केले जात होते.  पाठांतरावर आ्दारित अअसणाऱ्या प्रश्नांची मुले सहज उत्तरे देत होती. एकमेकांकडून एकमेकांच्या लेकरांना शाबासकी ददेण्याचे काम सुरु होते.  मी शांतपणे सर्व ऎकून घेत होतो. माझ्या मनात विचार आला की मुलांची अशी पोपटपंची म्हणजे शिक्षण असे पालकांना वाटतेय का?  खरोखरच याला शिक्षण म्हणावे का ? खरंतर शिक्षण म्हणजे विकास, शिक्षण मम्गणजे सुसंस्कार , शिक्षण म्हणजे अभिव्यक्ती इतक्या व्यापक अर्थाने असणारा हा शब्द आज केवळ परिक्षा अन परीक्षेचे गुणदान यापुरता मर्यादित राहतोय का?  आणि त्याच दृष्टीने प्रयत्न म्हणजे केवळ परिक्षा तयारी च्या शिक्षण हे मुलांचा विकास त्यांच्या कल...