Skip to main content

मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत

*मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत....*
📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक*
फोटो सौजन्य : Google 

            आज पहिलीच्या मुलांना मुक्त चित्र काढण्यासाठी कोरे कागद दिले होते. मी फळ्यावर फुले,बादली, ग्लास, फुलपाखरू यांचे सोप्या पद्धतीने काढलेली चित्रे फळ्यावर रेखाटली होती.

     सचिन ने काढलेले चित्र मला दाखवले.
मी म्हणालो,"हे काय आहे ?" सचिन, "हे भूताचे , हे माझे आणि हे माझ्या घराचे चित्र आहे". मी म्हटले, छान काढलेय.

मुलांनी सचिनचे चित्र पाहायला लगबग केली. सचिनच्या जवळ मुलांचा गलका जमा झाला. त्यांच्यात भुतांच्या गोष्टी वर गप्पा सुरू झाल्या. भूत अमुक असतं ,तमुक असतं आणि ब-याच गोष्टी चालू होत्या.माझ्या इयत्ता चौथीचा इंग्रजी विषय असल्याने मी पेपर तपासत असताना मुलांमधील सुरु असणा-या गप्पांकडे लक्ष जात होतेच.थोडा वेळ थांबून ऎकून घेतले.
गावात म्हसोबाचे मंदीर आहे त्या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जातेय. भूत म्हणले की देव आलाच त्यामुळे म्हसोबावर बोलत होते. म्हसोबावर कडे हातात घातले की भूत काय बी करत नाय. माझी आई म्हसोबाला  दिवा लावते त्यामुळे आम्हाला काय बी भ्याव नाय.मुले बोलतच होती.
      मी मुलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली.
भूत काय करते?
मुलांची उत्तरे ..
भुत लयी डेंजर असतया.
अंगात शिरते.
अंगात गेल्यावर मारून टाकते.
मी पाहिले होते एकाच्या अंगात भूत घुसले होते.
आमच्या मम्मीची सोन्याची पोत चोरून न्हेली.
पीठ अंगावर ओतून घेते.
      माझा पुढचा प्रश्न भूत कसं दिसते?
मुले उत्तरली .
भूत एकदम पांढरे दिसते .
भूत काळे दिसते .
कोणाचे पण रुप घेते.
            मुलांना मुक्तपणे व्यक्त होऊ दिले आणि नंतर त्यांना समजावून सांगितले. भूतं वगैरे काही नसतेच. आपल्या मनातील भितीतून घडणा-या गोष्टीला लोकं भूतं म्हणतात.
            मुलांना समजावून सांगितल्यानंतर मुलांच्या गप्पा नव्याने सुरु झाल्या. भूत-बीत काय नसतया.ते माणसंच राहत्यात .ते माणसं आपल्याला घाबरवत्या.
        खरंतर लहान लेकरं अाजूबाजूला जे
घडतेय ते बारकाईने नोंदवत असतात. बायका घरी बसल्यावर एकमेकांसोबत गप्पा करताना ,आईबापासोबत घरी निवांत वेळेत ब-याच वेळा भुताच्या गोष्टी कुटुंबात चर्चेल्या जातात. लेकरंही सोबत बसलेली असतात. त्यावेळी त्यांच्या सुरु असणाऱ्या गप्पा मुलांना कल्पनेत घेऊन जातात. मुले अशावेळी बोलत नसतात फक्त ऎकत असतात. मनात चित्रांची रचना सुरु असतेच. त्यांच्यात अमुक्याची भांडणं ,तमुक्याला देव पावलाय, अमुक्याला भुताने झपाटलेय म्हणून त्याच्या घरी अमुक घडतयं तमुक घडतेय . अशा गप्पा सुरू असतात. त्यामुळे मुलांना अशा गोष्टी ख-याच वाटतात. पालकांनी कल्पनातील भितीच्या गोष्टी मुलांच्या अवश्य कानावर घालाव्यात पण त्यापासून लेकरु घाबरणार नाही ,त्याच्या मनात उमटलेली प्रतिमा आयुष्यभर राहणार नाही.  यासाठी मुलांच्या मनात शिरलेल्या भितीच्या कल्पनात्मक प्रतिमेचे निरसन वेळीच व्हायला हवे. भविष्यात अशी मुले भितीच्या वातावरणात जगतात. त्यांच्यात पुरेसा आत्मविश्वास आढळत नाहीत.
       कल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास निश्चितच होतो पण कल्पना कोणती करतोय त्यावरही बरेच अवलंबून असते. नेहमीच भूतांच्या गोष्टी मुलांना भितीच्या कल्पनेच्या घेऊन जातात. वेळीच निरसन झाले नाही तर अशी मुले घाबरट तयार होऊ शकतात.
मुलांना कल्पनेच्या दुनियेत रमायला खुप आवडते पण त्या कल्पना विद्यार्थी विकास करेल अशा असायला हव्यात.
कल्पनेतून अभिव्यक्ती,कल्पनेतून रचना,कल्पनेतून विचार स्वातंत्र्य अशा कित्येक बाबी घडवून आणता येतात.

कल्पनेच्या आनंदी ,दुखी,स्वच्छंदी, सृजनशील ,भितीच्या दुनियेत पालक व शिक्षकांनी जायलाच हवे. मुलांसोबत मनसोक्त गप्पा करायला हव्यात. मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत बरेच काही घडत असते . यातून मूल समजून घ्यायला मदत होते. मुलांच्या अनेक समस्यांना सोडवता येतात आणि विकासाच्यादृष्टीने पुढचे प्रयत्न सुरु करता येतात.

https://shikshanvichar.blogspot.com/2018/10/blog-post_31.html?m=1

धन्यवाद 🙏🏻

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

जबाबदारी विकासाची

#जबाबदारी_विकासाची व्यक्तीच्या वर्तनात अपेक्षित वर्तनबदल घडवून आणणारी ,सर्वांगीण विकास साधणारी स्वयंस्फूर्त, अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया म्हणजे शिक्षण ...शिक्षण प्रक्रिया कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू असते.  मुलांच्या अध्ययनास मदत करणाऱ्या या संस्थांवर असणारी जबाबदारी सर्वांनी समजून घेणे गरजेचे असते. विद्यार्थी विकासाची संपूर्ण जबाबदारी शाळाचीच आहे असे म्हणणे म्हणजे स्वतः च्या जबाबदारीतून काढता पाय घेणे . कुटुंबाने काढता पाय घेतला तर मुलांच्या अध्ययनाच्या आणि विकासाच्या गतीवर परिणाम घडून येतो. मूल हे समाजाचा एक अविभाज्य घटक आहे .समाजातील सकारात्मक व नकारात्मक वातावरणात वाढत असते. शाळा ,कुटुंब यांनी निरीक्षणातून मुलांच्या विकासाच्यादृष्टीने प्रयत्नास मदत भेटत असते. शाळेतील अनेक गोष्टी मुलं कुटुंब आणि समाजाकडून शिकत असते याउलट समाजातील अनेक गोष्टी शाळा अन कुटुंबासोबत शिकत असते. कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या पातळीवर विद्यार्थी विकासाचा राजमार्ग पालक व शिक्षकांनी लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास मुलांचा सर्वांगीण विकास करणे सोपे जाते असे मला...