Skip to main content

लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या

*लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या*
लहान मुलांना खेळणी खेळायला खुप आवडते. शंभूराजला बाजारातून आणलेल्या गाड्यांच्या खेळण्यांची विशेष आवड आहे . आमच्या घरात ढीगभर गाड्या पडलेल्या असतात. तरीही इतर वस्तूंना गाडी समजून खेळण्याची भारी आवड आहे. आमच्या घरात शेजार मित्रमंडळींच्या लेकरांची आणि इतरही आजूबाजूच्या घरातील लेकरांची नेहमीच ये जा असते. शंभुराजच्या खेळण्यांचा सर्वजण आनंद घेत असतात त्यामुळे लेकरं लेकरांच्या जवळ आपसूक येतात. एकमेकांच्या खेळण्यांना शेअर करत असतील तर त्यांच्यातील सामाजिकतेचा बंध उत्तम गतीने विकसित होत आहे असे म्हणता येईल.
लहानपणी अनेक बदलातून मूल घडत असते. त्यापैकी एक आपली वस्तू कोणासही न देणे.  अशी मुलं आपल्या वस्तूला कोणासही हात लावू देत नाहीत .  त्याच्या वस्तूला हात लावलेलं अजिबात आवडत नाही.एका दृष्टीने ते बरोबर पण असेल पण अनेकदा मुलांमध्ये ही सवय दिसते की आपल्या वस्तू कोणालाही द्यायला तयार होत नाही. हे खास ज्यावेळी आपली वस्तू नवीन असते त्यावेळी मुले आपली वस्तू द्यायला तयार होत नाहीत.
खरंतर लहान मुलांना ही सवय असायला हवी की आपल्याकडे असलेली गोष्ट सहजतेने इतरांना देऊ शकेल ; अगदी बिस्किटांपासून ते इतर खेळण्यापर्यंत .कारण हीच सवय मुलांमध्ये सामाजिक बांधलकीचे बीजारोपण करत असते.त्यातून सामाजिक बांधिलकी तयार होत असते. यासाठी आपण मुलांना समजून सांगायला हवे की देण्यातही आनंद असतो. आपण चाॅकलेटस् आणलं तर घरातील प्रत्येकाला एक एक देऊन मग खायला हवे असं मुलांना समजून सांगायला हवे.
शंभू  त्याच्या अनेक खेळण्या मित्रांना शेअर करत असतो. चाॅकलेट वगैरे नेहमीच त्याच्या मित्रांना देत असतो. एकदा तर मी पाच चाॅकलेट आणल्या होत्या. त्याने मला तिथेच विचारले, "आप्पा इतक्या कुणाला घेतल्यात चाॅकलेट?" मी म्हणालो, "अरे तुलाच घेतल्यात" .
चाॅकलेटस् त्याच्या खिशात ठेवल्या. गाडी सुरु करुन आम्ही रुमच्या  दिशेने जात होतो. "मी माझ्या फेन्डस् ला देणार आहे आणि मला एक ठेवणार आहे चाॅकलेट " शंभू बोलत होता. "ठीक आहे" मी उत्तरलो.रूमजवळ गाडी लावल्यानंतर त्याच्या मित्रांच्या घरी जाऊन चाॅकलेट देऊन आल्यावरच परत रूममध्ये आला आणि म्हणाला, "दिल्या मी चाॅकलेट."
अशा लहान लहान देण्याच्या प्रसंगामुळे मुलांमध्ये दुस-यांसाठी वेळ देणे, दुस-यांना मदत करणे अशा भावना वाढीस लागतात.त्यामुळेच त्यांचा मित्रपरिवार, लोकसंग्रह वाढण्यास मदत होत असते. लहानपणी स्वतः च्या वस्तू ,खाऊ देण्याची   सवय त्याची पायाभरणी म्हणता येईल.

-ज्ञानदेव नवसरे,नाशिक

Comments

  1. Replies
    1. खूप छान , चार भिंतीबाहेर च जग दाखवून छान पालकत्व निभावताय तुम्ही

      Delete
    2. खूप छान , चार भिंतीबाहेर च जग दाखवून छान पालकत्व निभावताय तुम्ही

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

जबाबदारी विकासाची

#जबाबदारी_विकासाची व्यक्तीच्या वर्तनात अपेक्षित वर्तनबदल घडवून आणणारी ,सर्वांगीण विकास साधणारी स्वयंस्फूर्त, अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया म्हणजे शिक्षण ...शिक्षण प्रक्रिया कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू असते.  मुलांच्या अध्ययनास मदत करणाऱ्या या संस्थांवर असणारी जबाबदारी सर्वांनी समजून घेणे गरजेचे असते. विद्यार्थी विकासाची संपूर्ण जबाबदारी शाळाचीच आहे असे म्हणणे म्हणजे स्वतः च्या जबाबदारीतून काढता पाय घेणे . कुटुंबाने काढता पाय घेतला तर मुलांच्या अध्ययनाच्या आणि विकासाच्या गतीवर परिणाम घडून येतो. मूल हे समाजाचा एक अविभाज्य घटक आहे .समाजातील सकारात्मक व नकारात्मक वातावरणात वाढत असते. शाळा ,कुटुंब यांनी निरीक्षणातून मुलांच्या विकासाच्यादृष्टीने प्रयत्नास मदत भेटत असते. शाळेतील अनेक गोष्टी मुलं कुटुंब आणि समाजाकडून शिकत असते याउलट समाजातील अनेक गोष्टी शाळा अन कुटुंबासोबत शिकत असते. कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या पातळीवर विद्यार्थी विकासाचा राजमार्ग पालक व शिक्षकांनी लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास मुलांचा सर्वांगीण विकास करणे सोपे जाते असे मला...